Corona Update 
देश

पुढील शंभर दिवस महत्त्वाचे; तिसऱ्या लाटेबद्दल सरकारचा इशारा

विनायक होगाडे

नवी दिल्ली : देशातील कोरोना प्रकरणांमध्ये घट कमी आहे. त्यामुळे कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी इशारा दिला आहे. सरकारने म्हटलंय की, पुढील तीन ते चार महिने कोरोना विरोधातील लढ्यासाठी महत्त्वाचे आहेत. आज आरोग्य मंत्रलयाच्या पत्रकार परिषदेत जॉइंट सेक्रेटरी (आरोग्य) लव अग्रवाल यांनी म्हटलंय की, कोरोनाची तिसरी लाट ही लोकांच्या वागण्यावर आणि लशीकरणाच्या गतीवर अवलंबून आहे. भारतात एप्रिल आणि मे महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती, त्यावेळी मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं. या काळात आरोग्य यंत्रणा अपुरी पडल्याचं चित्र दिसून आलं होतं. तज्ज्ञांनी आता ऑगस्ट वा ऑक्टोबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या नव्या लाटेत लहान मुलांना धोका अधिक असल्याचंही सांगण्यात आलंय.

दुसऱ्या लाटेदरम्यान देशांतील बहुतांश राज्यात कडक लॉकडाऊन लावावा लागला होता. मात्र, जसजसे रुग्ण कमी होत गेले आणि परिस्थिती थोडी आटोक्यात येत गेली तसतसे हे निर्बंध कमी करण्यात आले. मात्र, लव अग्रवाल यांनी म्हटलं की, निर्बंध कमी केल्यानंतर लोकांनी पुन्हा एकदा कोरोनाच्या नियमांमध्ये ढिलाई केल्याचं चित्र आहे. आपल्याला मास्कचा वापर हा 'न्यू नॉर्मल'प्रमाणे केला पाहिजे. दुसऱ्या लाटेच्या दरम्यान मास्कचा वापर मार्च-एप्रिल महिन्यात वाढला मात्र, त्यानंतर जून-जुलै दरम्यान तो पुन्हा घसरत गेला, अशीही माहिती त्यांनी दिली. आकडेवारीच्या अंदाजानुसार, मास्कचा हा वापर ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांपर्यंत घसरत जाईल. अनेक लोक थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जात असल्याचं देखील चित्र आहे. पंतप्रधानांनी तसेच आरोग्य मंत्रालयाने देखील याबाबत वारंवार सुचना दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon Maharashtra 2026 : मॉन्सून केरळमध्ये ४ दिवस आधीच पोहोचणार, पण महाराष्ट्रात कधी दाखल होणार? नवी अपडेट समोर

Latest Marathi News Live Update : डिझेलसाठी सातबारा मागणाऱ्या पंपचालकांवर कारवाई होणार

Maharashtra Electricity: थेट ग्राहकांना शॉक! महावितरणची वीजगळती १५% वर; ८०० कोटींचा थेट भुर्दंड ग्राहकांवर..

Bharat Forecast System : हवामानाच्या संकटाशी लढण्यासाठी महाराष्ट्राला मिळालं 'ब्रह्मास्त्र'; IITM च्या अत्याधुनिक यंत्रणेमुळे आता काळजी मिटली, पाहा काय आहे नवीन प्रणाली?

Maharashtra Politics: आमदार होईपर्यंत अनवाणी’ संकल्प पूर्ण; नवसपूर्तीप्रसंगी नेता अन् कार्यकर्त्याच्या डोळ्यांत आश्रू, शिर्डीत निष्ठेचे अनोखे दर्शन..

SCROLL FOR NEXT