Govt should ensure peace is restored says RSS
Govt should ensure peace is restored says RSS 
देश

सरकारने जबाबदारी सुनिश्चित करावी; आरएसएसचा केंद्र सरकारवर निषाणा

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शांतता प्रस्थापित करण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितले आहे. सरकारने त्यांची जबाबदारी सनिश्चित करायला हवी असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस सुरेश भैय्याजी जोशी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशांतता असलेल्या भागांमध्ये सरकारने शांतता प्रस्थापित केली पाहिजे असेही भैय्याजी जोशी म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन रविवारी रात्री उत्तर पूर्व दिल्लीच्या वेगवेगळया भागांमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला. बुधवारी रात्रीपर्यंत मृतांचा आकडा २७ पर्यंत पोहोचला होता. त्या पार्श्वभूमीवर त्यानी असे सांगितले आहे.

गावागावात रंगू लागले आहेत पार्ट्यांचे बेत

तत्पूर्वी, दिल्लीतील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीमध्ये सगळ्या शाळा बंद करण्यात आल्या आहेत. तसेच, बोर्डाच्या परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. सिसोदिया यांनी सीबीएसईला बुधवारी होणारी बोर्ड परीक्षा तहकूब करण्याची विनंती केली होती. त्यानंतर सीबीएसईने बुधवारी होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT