Suicide
Suicide  sakal media
देश

पती-पत्नीची आत्महत्या; गळफास घेण्याआधी ३ मुलांना पाजलं विष

सकाळ डिजिटल टीम

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला.

हरयाणातील पलवल जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच जणांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पलवल जिल्ह्यातील औरंगाबाद गावात ही घटना घडली असून घटनास्थळी पोहोचल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मृतांमध्ये पती पत्नी आणि तीन मुलांचा समावेश आहे. पती पत्नीमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट आढळलेली नाही. मात्र शेजाऱ्यांनी हे कौटुंबिक वादातून झाल असेल असं म्हटलं आहे.

पोलिसांनी घटनास्थळी प्राथमिक तपास केल्यानंतर अशी माहिती समोर आली आहे की, पती पत्नीने गळफास घेत आत्महत्या केली. त्याआधी तीन मुलांना विष देऊन मारलं. मंगळवारी रात्री पती पत्नीमध्ये कोणत्या तरी कारणावरून वाद झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यानंतर रात्री दोघांनी मुलांना आधी विष दिलं त्यानंतर स्वत: गळफास घेत आत्महत्या केली.

कुटुंब प्रमुखाला सकाळी पाच जणांचे मृतदेह घरात दिसताच मोठा धक्का बसला. पोलिसांना माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. मृतांमध्ये नरेश (वय ३३) पत्नी आरती (वय ३०) यांच्यासह सात वर्षांचा मुलगा, ९ वर्षांची मुलगी आणि ११ वर्षांच्या पुतणीचा समावेश आहे. या प्रकरणाची चौकशी पोलिस करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

Samantha Ruth Prabhu: एकवेळेच्या जेवणाचीही होती भ्रांत अन् आज आहे कोट्यवधींची मालकीण; 'ऊ अंटावा' गर्ल समंथाचा सुपरस्टार होण्याचा प्रवास

मोठी बातमी! बारावीचा 25 मे तर दहावीचा निकाल 5 जूनपूर्वी; विद्यार्थ्यांची जुलैमध्ये पुरवणी परीक्षा; बोर्डाच्या परीक्षेत भविष्यात असा होईल बदल

SCROLL FOR NEXT