rg hathras 
देश

उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना लाठीमार; हाथरस प्रकरणातील मुलीच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखले

सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - हाथरसमध्ये सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले आहेत. मात्र त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्यानं ते पायी चालत गेले. पण वाटेतच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी धक्का दिला आणि काठीने मारहाण केली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणारच असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी वाटेतच रोखलं. त्यानंतर यमुना एक्सप्रेस वेवर त्यांनी ठिय्या मांडला आहे. 

राहुल गांधी यांच्यासोबत कार्यकर्तेसुद्धा असून त्यांनाही मारहाण झाली असल्याचं सागंण्यात येत आहे. हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेचा 29 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मृत्यूनंतरही पीडितेच्या कुटुंबियांसोबत अन्याय झाल्यानं हा संताप अधिकच वाढला आहे. पोलिसांनी कुटुंबियांच्या अनुपस्थितीतच मृतदेहावर अंत्यसस्कार केले होते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : वसई-विरार महानगरपालिका निवडणूक मतदान दुपारी १.३० वाजेपर्यंत ३३.००% मतदान

Uddhav Thackeray: मुख्यमंत्री म्हणतात रडीचा डाव मग अधिकाऱ्यांना तुम्ही घरगडी नेमलं का? उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

Latest Marathi News Live Update : विरोधकांना लक्ष्य करण्याची ईडीची कारवाई लाजिरवाणी : सुप्रिया श्रीनेत

काही निर्मात्यांची मस्ती उतरवली पाहिजे.... दिग्पाल लांजेकरांवर संतापले अमेय खोपकर; म्हणाले- महाराजांवर सिनेमा म्हणून मी गप्प...

Virat Kohli : १४०३ दिवसांनी अव्वल बनलेल्या विराटचे स्थान संकटात; राजकोटमधील चूक पडणार महागात, काही तासांत ताज गमावणार

SCROLL FOR NEXT