rg hathras 
देश

उत्तर प्रदेश पोलिसांकडून राहुल गांधींना लाठीमार; हाथरस प्रकरणातील मुलीच्या कुटुंबाला भेटण्यापासून रोखले

सकाळ वृत्तसेवा

लखनऊ - हाथरसमध्ये सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झालेल्या पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी गेले आहेत. मात्र त्यांच्या गाड्या अडवण्यात आल्यानं ते पायी चालत गेले. पण वाटेतच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला आहे.

पोलिसांनी धक्का दिला आणि काठीने मारहाण केली असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणारच असं म्हणणाऱ्या राहुल गांधींना पोलिसांनी वाटेतच रोखलं. त्यानंतर यमुना एक्सप्रेस वेवर त्यांनी ठिय्या मांडला आहे. 

राहुल गांधी यांच्यासोबत कार्यकर्तेसुद्धा असून त्यांनाही मारहाण झाली असल्याचं सागंण्यात येत आहे. हाथरस इथं झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर पीडितेचा 29 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे.

मृत्यूनंतरही पीडितेच्या कुटुंबियांसोबत अन्याय झाल्यानं हा संताप अधिकच वाढला आहे. पोलिसांनी कुटुंबियांच्या अनुपस्थितीतच मृतदेहावर अंत्यसस्कार केले होते. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपनं डावललं, RSS च्या स्वयंसेवकाने संपवलं जीवन...

"तिने लग्नाला बोलावलं नाही याचं वाईट वाटलं..." आलिया भट्टच्या काकांनी व्यक्त केली खंत; म्हणाले..

Dhaba Style Egg Palak Curry: वीकेंड होईल एकदम स्पेशल... बनवा झणझणीत अन् मसालेदार ढाबा स्टाईल अंडा पालक करी

Latest Marathi Breaking News Live : विक्रोळी गांधी नगर ट्रॅफिक बीट चौकीला आग

Bihar Election Result: बिहारने जातीय राजकारण नाकारले; मोदी यांची काँग्रेसवर टीका, सुरतमध्ये बिहारी नागरिकांशी संवाद

SCROLL FOR NEXT