smriti irani 
देश

Hathras - अखेर स्मृती इराणींनी सोडलं मौन, राहुल गांधींवर केली टीका

सकाळ वृत्तसेवा

वाराणसी- हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अखेर मौन सोडलं आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणाला न्याय देतील असा त्यांना विश्वास आहे. त्याचबरोबर त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला असून हाथरसला राहुल गांधी केवळ राजकारणासाठी जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या मौनावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते. यूपीए सरकारच्या काळात महिला अत्याचारापासून ते महागाईपर्यंतच्या प्रत्येक मुद्द्यावर त्यांना धारेवर धरणाऱ्या स्मृती इराणी यांनी हाथरस प्रकरणी मौन का बाळगले आहे, असा सवाल देशभरातील विरोधी पक्षांनी केला होता. त्याचदरम्यान स्मृती इराणी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आणि राहुल गांधी यांच्यावर टीका ही केली. 

स्मृती इराणी पुढे म्हणाल्या, राहुल गांधी प्रत्येक गोष्टीचे राजकारण करण्याच्या प्रयत्नात असतात. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राष्ट्रनीतीमध्ये यशस्वी झाले आहेत. मला वाटतं की, देशातील जनतेला काँग्रेसचे हे डावपेच चांगलेच समजले आहेत. कोणताही नेता कोणत्याही विषयाचे राजकारण करु इच्छितो, त्याला मी रोखू शकत नाही. परंतु, जनतेला माहीत आहे की, राहुल गांधी हे हाथरसला पीडितेला न्याय देण्यासाठी जात नसून राजकारणासाठी जात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT