HEAT WAVE AND GLOBAL WARMING 
देश

IMDचा पाच राज्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट; कमाल तापमानाचा उच्चांक

१ मे पर्यंत उष्ण लहरींची परिस्थिती कायम राहिल असंही IMDनं म्हटलं आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : भारतातील अनेक भागांना सध्या उष्ण लहरींचा तडाखा बसला असून अनेक भागातील तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्यावर गेलं आहे. दरम्यान, भारतीय हवामान खात्यानं (IMD) दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील पाच राज्यांना ऑरेंज अॅलर्ट जाहीर केला आहे. १ मे पर्यंत ही उष्ण लहरींची परिस्थिती कायम राहिल असा इशाराही IMD कडून देण्यात आला आहे. (Heatwave in India IMD issues orange alert for 5 states)

राजस्थान, दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा या पाच राज्यांना उष्ण लहरींचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमधील अनेक भागांमध्ये तापमान ४५ डिग्री सेल्सिअसच्यावर राहण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पंजाब, हरयाणा-चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगालमधील गंगेचं खोरं, ओडिशा तसेच गुजरातमधील उत्तर भागातही उष्ण लहरी कायम राहण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, राजस्थान, गुजरात आणि आंध्र प्रदेशात एसी आणि पंख्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढल्याने कारखान्यांसाठी वीज कपात लागू करण्यात आली आहे. तर दुसरीकडे पाण्याच्या तुटवड्यामुळं शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. गहु उत्पादकांनाही याचा मोठा फटका बसणार आहे. यामुळं गहु निर्णायतीवरही याचा परिणाम होणार आहे, सध्या युक्रेनमध्ये युद्ध सुरु असल्यां जगाला गव्हाचा तुटवडा भासू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT