Depressed-man.jpg google
देश

भारतात सर्वाधिक मृत्यू आत्महत्येमुळे, बिहारमधील परिस्थिती मात्र उलट

भारतात हत्येचे प्रमाण 2.2 टक्के आहे आणि आत्महत्येचे प्रमाण 11.3 टक्के आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : जगभरातील अनेक देश हत्यांसारखे (Murder) गुन्हे रोखण्यासाठी अनेक प्रयत्न करत असून, यासाठी अनेक देशांच्या सरकार मोठ्या प्रमाणात पैसादेखील खर्च केला जातो. मात्र, जागतिक स्तरावर करण्यात आलेल्या एका विश्लेषणातून जगभरात, हत्येपेक्षा जास्त लोक आत्महत्येने (suicide) मरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चिंतेची बाब म्हणजे जागतिक स्तरावरील या विश्लेषणात भारतात (India) आत्महत्येमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे असल्याचे समोर आले आहे. प्रत्येकी 5 दशलक्षाहून अधिक लोकसंख्या असलेल्या 113 देशांमधील डेटाचे जागतिक विश्लेषण असे दर्शविते की, जागतिक स्तरावर आणि भारतात दोन्ही ठिकाणी आत्महत्येमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. (Suicides Claim More Lives Than Murders In India survey)

भारताबाबत बोलायचे झाले तर येथे आत्महत्यांचे प्रमाण खूनापेक्षा जास्त आहे. मात्र, बिहार हे एकमेव राज्य आहे जिथे खुनाचे प्रमाण जास्त आहे. भारतात हत्येचे प्रमाण 2.2 टक्के आहे आणि आत्महत्येचे प्रमाण 11.3 टक्के आहे. जपानबद्दल बोलायचे झाले तर आत्महत्यांचे प्रमाण येथे खूनांच्या घटनांपेक्षा 57 पट जास्त आहे. श्रीलंकेत हत्येचे प्रमाण 3.5 टक्के आहे आणि आत्महत्येचे प्रमाण 19.2 टक्के आहे. नेपाळमध्ये हत्येचे प्रमाण 2.3 टक्के आहे, तर आत्महत्येचे प्रमाण 12.3 टक्के आहे. त्याचप्रमाणे बांगलादेश, पाकिस्तान आणि म्यानमारमध्येही हत्येपेक्षा आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे.(suicide Ratio In India)

कोरानामुळे आत्महत्यांमध्ये वाढ

जगभरात कोरोनामुळे (Corona) झालेल्या लॉकडाऊनने (Lock down) हजारो लोकांना रोजगापासून मुकावे लागले आहे. एवढेच नव्हे तर, लॉकडाऊनमुळे घरात कैद झाल्यामुळे अनेक नागरिकांना मानसिक नैराश्याने ग्रासले होते. हे देखील आत्महत्येमागे प्रमुख कारण मानले जात आहे. मात्र, समोर आलेली ही आकडेवारी नक्कीच चिंतेची बाब असून, यावर जगातील देश कशाप्रकारे नियंत्रण मिळवतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

SCROLL FOR NEXT