देश

हिंदी भाषा केवळ शूद्रांसाठी; DMK च्या खासदाराचे वादग्रस्त वक्तव्य

टीकेएस एलांगोवन यांच्या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : द्रमुकचे खासदार टीकेएस एलांगोवन (TKS Elangovan ) यांनी हिंदी ही अविकसित राज्यांची भाषा असल्याचे विधान केले आहे. त्यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा भाषा-युद्धात नव्या वादाला तोंड फोडले आहे. एवढचे नव्हे तर, हिंदी ही केवळ शूद्रांसाठी असल्याचे विधान करत त्यांनी कथित जातीयवादी टिप्पणीही केली. त्यांच्या या विधानानंतर आता देशात आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. (DMK MP TKS Elangovan Controversial Statment On Hindhi Language)

टीकेएस एलांगोवन की, "हिंदी ही केवळ बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान सारख्या अविकसित राज्यांमध्ये मातृभाषा आहे. पश्चिम बंगाल, ओडिशा, तेलंगणा, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात आणि पंजाब पहा. ही सर्व विकसित राज्ये नाहीत का? हिंदी ही या राज्यांतील लोकांची मातृभाषा नसल्याचे ते म्हणाले.

एप्रिलमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत पार पडलेल्या संसदीय राजभाषा समितीच्या बैठकीत इंग्रजीला पर्याय म्हणून हिंदी भाषा स्वीकारली जावी, स्थानिक भाषा नाही असे वक्तव्य केले होते. त्यानंतर आता हिंदी आपल्याला क्षुद्र बनवू शकते. तसेच हिंदी आपल्यासाठी चांगली नाही, असे विधान टीकेएस एलांगोवन यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर आता देशात नव्या वादाला तोंड फुटणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: घुसखोरांना बाहेर पाठवणार; मोदी, काँग्रेसने बिहारींचा अपमान केला, विरोधकांना विकास असह्य

ST Bus Ticket Price Hike: एल्फिन्स्टन पूल कामाचा प्रवाशांना भुर्दंड, एसटी तिकीट दरात २० रुपयांची वाढ!

दूध, तूप अन् लोणी होणार स्वस्त! मदर डेअरीचा मोठा निर्णय, GST कपातीनंतर दरात केले बदल

High Court: राज्यात राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी होत आहे का? उच्च न्यायालय, राज्य शासनाला तीन आठवड्यात मागविले उत्तर

'IND vs PAK सामना १५ ओव्हरनंतर बंदच केला, कारण...', सौरव गांगुलीचं मोठं व्यक्तव्य

SCROLL FOR NEXT