Mahatma Gandhi, History of august kranti 
देश

Mahatma Gandhi : इतिहास 8 ऑगस्टचा; महात्मा गांधीजींच्या चळवळीने ब्रिटीश राजसत्ता हादरली होती

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.

सकाळ डिजिटल टीम

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आजचा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो.

08 ऑगस्ट या दिवसाला भारतीय इतिहासात वेगळ स्थान आहे. हा दिवस स्वातंत्र्याच्या शेवटच्या युद्धाचा शंख म्हणून स्मरणात ठेवला जातो. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी चालवलेल्या 'भारत छोडो' आंदोलनाचा पाया या दिवशी घातला गेला. (BraveSalute) यानंतर संपूर्ण देश इंग्रजांविरुद्ध एकवटला आणि ब्रिटिश सरकारला गुडघे टेकावे लागले. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा दिवस क्रांती दिन म्हणून ओळखला जातो. (AchievementsAt75) मुंबईतील ज्या मैदानावर ध्वजारोहनची सुरुवात झाली ती जागा क्रांती मैदान म्हणून ओळखली जाऊ लागली. (Mahatma Gandhi, History of august kranti)

दुसऱ्या महायुद्धात भारताची मदत घेऊनही इंग्रजांनी भारताला स्वतंत्र करण्याचे वचन पाळले नव्हते. अशी १९४२ ची ही गोष्ट आहे. (IndiaAt75) तेव्हा देशभर गांधीजींनी 'भारत छोडो' आंदोलन सुरू केले होते. 8 ऑगस्ट रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटीच्या मुंबई अधिवेशनात या आंदोलनाचा ठराव मंजूर करण्यात आला होता. परंतु त्यानंतर गांधींना पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये कैद करण्यात आले आणि जवळपास सर्व नेत्यांना अटक करण्यात आली होती. (BestofBharat)

अशा स्थितीत युवा नेत्या अरुणा आसिफ अली यांनी ९ ऑगस्ट रोजी मुंबईतील ग्वालिया टँक मैदानावर तिरंगा फडकवून 'भारत छोडो' आंदोलनाचा झेंडा उंचावला होता. गांधीजींनी अहिंसक आंदोलन पुकारले असले तरी या आंदोलनामुळे देशात अनेक ठिकाणी तोडफोड आणि हिंसाचारच्या घटना घडल्या होत्या. दुसर्‍या महायुद्धातून इंग्रजांचे कंबरडे मोडले होते आणि या चळवळीने ब्रिटीश राजवटीच्या शपेटीत शेवटचा खिळा ठोकला गेला होता.

देशात दरवर्षी हा दिवस ऑगस्ट क्रांती दिन म्हणून साजरा केला जातो. ज्यामध्ये स्वातंत्र्य लढ्यात बलिदान दिलेल्या क्रांतिकारकांना श्रद्धांजली वाहिली जाते. यासोबतच महात्मा गांधींनी म्हणजेच बापूंनी दिलेली शिकवण आठवते जी सध्याच्या काळात देश विसरत चालला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

Rahul Narwekar : अलिबागमध्ये नेमकं काय घडलं होतं? राहुल नार्वेकरांनी सांगितला घटनाक्रम; संजय राऊतांनाही दिलं आव्हान

Beed News : बीडमध्ये ‘लेडी बाऊन्सर्स’ची एन्ट्री; बिल्डरभोवती महिला सुरक्षेची कडेकोट फौज! जमिनीच्या वादानंतर घेतला अनोखा निर्णय

SCROLL FOR NEXT