farmer protest sakal
देश

वारंवार रस्ते कसे अडवले जाऊ शकतात? SCचा केंद्राला सवाल

रस्ते कायमचे कसे आडवले जाऊ शकतात? सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्यांच्याविरोधात देशाच्या राजधानीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. यासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलकांकडून रस्ते अडवण्यात आले आहेत. यावर आता सुप्रीम कोर्टानं भाष्य केलं आहे. कोर्टानं केंद्र सरकारकडे याबाबत विचारणा करताना सरकारने हे अडवलेले रस्ते मोकळे करण्यासाठी काय केलं? असा सवाल विचारताना अशा प्रकारे रस्ते कायमस्वरुपी कसे काय अडवले जाऊ शकतात? अशी टिप्पणीही केली. न्यायमूर्ती संजय कौल यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं की, या समस्येचं समाधान न्यायालयीन लढाई, आंदोलन किंवा संसदीय चर्चेतून तोडगा काढला जाऊ शकतो. पण रस्ते अडवून ठेवले जाऊ शकत नाहीत, तसेच हा कायमस्वरुपाचा तोडगा असू शकत नाही.

खंडपीठानं सरकारला उद्देशून म्हटलं की, "आपण आधीच कायदा केला असून आता तो लागू करावा लागेल. जर त्यांनी अतिक्रमण केलं तर तुम्ही म्हणू शकता की तुम्ही आमच्या अधिकार क्षेत्रात अतिक्रमण करत आहात. काही तक्रारी आहेत त्यावर तोडगा निघायला हवा." दरम्यान, कोर्टानं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि अॅडिशनल सॉलिसिटर जनरल के. एम. नटराज यांच्याकडे विशेषत्वानं विचारणा केली की, सरकार याप्रकरणी काय करत आहे?

केंद्र सरकारला अर्ज दाखल करण्यास मिळाली परवानगी

सुप्रीम कोर्टाच्या प्रश्नाला उत्तर देताना मेहता म्हणाले, "तीन सदस्यीय उच्चस्तरीय समितीची नेमणूक करण्यात आली आहे. आम्ही आंदोलक शेतकऱ्यांना बैठकीत सहभागी होण्यासाठी आमंत्रित केलं आहे. पण ते बैठकीत सहभागी होऊ इच्छित नाहीत. तसेच मेहता यांनी मोनिका अग्रवाल यांच्याकडून दिल्ली आणि नोयडामध्ये आंदोलनामुळं होत असलेल्या गोंधळाविरोधात दाखल याचिकेत आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या संघटनांना पक्षकार बनवण्यासाठी कोर्टाची परवानगी मागितली. यावर सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला या संबंधी एक अर्ज दाखल करण्याला परवानगी दिली. तसेच या प्रकरणाची सुनावणी विचारविनिमयासाठी सोमवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

सर्वसामान्यांना करावा लागतोय मोठ्या गैरसोयीचा सामना

२३ ऑगस्ट रोजी झालेल्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टान म्हटलं होतं की, "आंदोलकांनी रस्ते अडवता कामा नयेत याची खबरदारी केंद्र आणि राज्य सरकारांनी घेणं गरजेचं आहे. अनेक काळापासून आंदोलकांकडून रस्ते अडवण्यात आल्याने याची सुप्रीम कोर्टानं गंभीर दखल घेत याबाबत केंद्र आणि राज्यांना सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT