Husband of Nirmala Sitharaman Parakala Prabhakar criticizes Modi Government
Husband of Nirmala Sitharaman Parakala Prabhakar criticizes Modi Government 
देश

अर्थमंत्र्यांचे पतीच म्हणतात, मोदीच मंदीला जबाबदार

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : भारतातील मंदीमुळे मोदी सरकारवर सगळीकडून टीका होत असताना, आता खुद्द अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या पतीनेही आर्थिक मंदीला पंतप्रधान मोदीच जबाबदार असल्याचे सांगितले. आतापर्यंत विरोधक टीका करतच होते, आता मात्र अर्थमंत्र्यांच्या पतीनेच टीका केल्यामुळे हे प्रकरण गंभीर बनले आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांचे पती पराकला प्रभाकर यांनी देशात सुरू असलेल्या आर्थिक मंदीवर भाष्य केले आहे. नवीन धोरण तयार करण्यासाठी मोदी सरकारची इच्छाशक्ती नाही असाही आरोप त्यांनी केला. मोदी सरकारने माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव आणि डॉ. मनमोहनसिंह यांचे फायनॅन्शियल मॉडेल पुन्हा साकारले पाहिजे. मोदी सरकारने समाजवादावर टीका करण्यापेक्षा अर्थव्यवस्था सुधारण्याकडे लक्ष द्यायला हवे, असे त्यांनी सांगितले. 'द हिंदू' या वर्तमानपत्रात लिहिलेल्या सदरात त्यांनी हे सर्व मुद्दे मांडले आहेत.     

कोणतेही क्षेत्र घ्या, सर्व क्षेत्रात आव्हानात्मक परिस्थिती आहे. सरकारही नकारात्मक विचार करत आहे व त्यामुले आपली परिस्थिती आणखीच गंभीर होत चालली आहे. नेहरूंच्या धोरणावर टीका करण्यापेक्षा अर्थव्यवस्था सुधारण्याकडे सरकारने लक्ष द्यावे असे त्यांनी या लेखात सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT