I am asked to comment on the Chintan camp I am asked to comment on the Chintan camp
देश

प्रशांत किशोर म्हणाले, मला चिंतन शिबिरावर भाष्य करण्यास सांगितले जाते

सकाळ डिजिटल टीम

मला वारंवार उदयपूर चिंतन शिबिराच्या निकालावर भाष्य करण्यास सांगितले जात आहे. माझ्या मते स्थिती सुधारणे आणि काँग्रेस नेतृत्वाला थोडा वेळ देणे याशिवाय अर्थपूर्ण काहीही साध्य करण्यात अपयश आले. नुकतेच संपलेले काँग्रेसचे चिंतन शिबिर अपयशी ठरले आहे, असे प्रशांत किशोर (Prashant kishor) ट्विटमध्ये म्हणाले. (I am asked to comment on the Chintan camp)

अलीकडे त्यांची काँग्रेससोबतची प्रदीर्घ चर्चा निष्फळ ठरली. यानंतर पीके यांनी काँग्रेसबद्दल म्हटले होते की, त्यांच्या नेत्यांना विश्वास आहे की जनता स्वतः सरकार उलथवून टाकेल आणि त्यांना सत्ता मिळेल. काँग्रेस (Congress) प्रदीर्घ काळ सत्तेत असून विरोधी पक्षात कसे राहायचे हेच कळत नसल्याचे प्रशांत किशोर म्हणाले होते.

काँग्रेसच्या (Congress) लोकांमध्ये समस्या असल्याचे मला दिसत आहे. त्यांचा असा विश्वास आहे की आम्ही देशावर दीर्घकाळ राज्य केले आणि जेव्हा लोक संतप्त होतील तेव्हा ते सरकार पाडतील आणि मग आम्ही येऊ. ते म्हणतात तुम्हाला काय माहीत, आम्हाला सर्व काही माहीत आहे. आम्ही बरेच दिवस सरकारमध्ये आहोत, असेही प्रशांत किशोर (Prashant kishor) म्हणाले होते.

मागे प्रशांत किशोर नव्या पक्षाची घोषणा करतील अशी अटकळ होती. मात्र, प्रशांत किशोर यांनी आपण अद्याप पक्ष स्थापन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. सध्या त्यांचे लक्ष बिहारच्या सामाजिक आणि राजकीय जीवनाशी संबंधित लोकांना भेटणे आहे. त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार आहे. मी लोकांना भेटेन. जर ते लोक एकत्र आले आणि आम्हाला राजकीय पक्षाची गरज वाटली त्यानंतर पक्षाची घोषणा करू. पण हा पक्ष प्रशांत किशोरचा नसून सर्वांचा पक्ष असेल, असे प्रशांत किशोर (Prashant kishor) म्हणाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT