rahul gandhi, Modi Government, Congress  
देश

पत्रकार परिषदेतील 'त्या' प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले, मला पत्रकार व्हायचे नाही!

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : कोरोनाजन्य परिस्थितीमुळे ओढावत असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रघुराम राजन यांच्यासोबत चर्चा केल्याचे पाहायला मिळाले होते. याशिवाय त्यांनी नोबेल पुरस्कार विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांच्यासोबतही खुली चर्चा केली होती. याच पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता.  अर्थव्यवस्थेला मजबूत करण्यासाठी या दोन लोकांनी तुम्हाला कोणता गुरुमंत्र दिला, असा प्रश्न राहुल गांधींना एका पत्रकाराने व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या पत्रकार परिषदेत विचारला होता. यावर राहुल गांधी म्हणाले की, मी तुमच्या क्षेत्रात येणार नाही. मला पत्रकार व्हायचे नाही. त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. 

राहुल गांधी पुढे म्हणाले ,  मी केवळ दिग्गज अर्थशास्त्रज्ञांसोबतच नव्हे तर मजूर, छोटे उद्योजक, शेतकरी यांच्याशी चर्चा करत असतो.  मला पत्रकार व्हायचे नाही, त्यामुळे तुम्ही घाबरु नका. कामाच्या निमित्ताने अनेक लोकांशी चर्चा होते. ही चर्चा नेहमी बंद खोलीत होते. काहीवेळा चर्चा गंभीर स्वरुपाची असते तर कधी हलक्या फुलक्या स्वरूपातील चर्चाही उपयुक्त माहिती समोर येते. बंद खोलीत मला जे ऐकायला मिळते ते जनतेही ऐकावे असे वाटले. त्यामुळे या संभाषणाची एक झलक दाखवून दिली, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ज्ञान आणि समज ही सर्वांकडेच असते. मजूर, शेतकरी, छोटे व्यापारी यांच्यासोबत देखील अशा प्रकारची चर्चा निश्चित करु, असेही राहुल गांधींनी यावेळी म्हटले आहे.

कोरोनाजन्य परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकार आणि प्रशासनाचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत काय झाले यावर सत्ताधाऱ्यांना घेरण्यापेक्षा सध्याच्या घडीला निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना कसा करावा यावर विचार करणे ही विरोधी पक्षाची भूमिका असेल, असेही स्पष्ट केले. अर्थव्यवस्था पुन्हा सुरळीत करण्यासाठी देशातील गरिब जनतेच्या खिशात पैसा देण्याची व्यवस्था करणे हा उत्तम मार्ग आहे. मोदी सरकारने 20 लाख कोटींच्या पॅकेजमधील तरतूदींमध्ये बदल करावा, अशी सूचनाही राहुल गांधी यांनी यावेळी केली. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 'आत्मनिर्भर भारत' अभियानाअंतर्गत केलेल्या घोषनेमध्ये काँग्रेसच्या मनरेगा योजनेला नव संजीवनी देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर आता राहुल गांधी यांनी मोदी सरकारने संकटजन्य परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काँग्रेसची न्याय योजना तात्पूरती लागू करण्याबाबत विचार करावा, असे म्हटले आहे. मनरेगा ही ग्रामीण भागातील लोकांना काम मिळवून देण्यास फायदेशीर असून न्याय योजना ही शहरी भागाचा विचार करुन तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT