RSS Chief Mohan Bhagwat, coronavirus : कोरोना महामारीच्या (Covid-19) संकटातून बाहेर पडण्यासाठी एकजूट राहून एक टीम म्हणून काम करण्याची गरज आहे. वर्तमान परिस्थितीत तर्कहीन वक्तव्ये करणे टाळले पाहिजे. आता तिसऱ्या लाटेबद्दल (third wave of corona) सांगितले जात आहे. मात्र घाबरण्याचे कारण नाही. यासाठी देखील सज्ज राहायला हवे. तिसऱ्या लाटेला आपण घाबरत आहोत का? तिसरी लाट आलीच तर लाटा आदळणाऱ्या एखाद्या खडकासारखे आपण सज्ज असले पाहिजे, असे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagawat) म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दिल्ली शाखेतर्फे ‘हम जितेंगे: पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ व्याख्यानमालेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. काही लोक कोरोना पॉझिटिव्ह (positive) झाले तर आपली बदनामी होईल या भीतीने कोरोना झाल्याचेच लपवून ठेवतात. योग्य वेळी उपचार घेत नाहीत, या वस्तुस्थितीवर भागवत यांनी नेमकेपणाने बोट ठेवले. (If a third wave of coronavirus comes, we will defeat it: RSS Chief Mohan Bhagwat)
कोरोनाच्या पहिल्या (corona) लाटेनंतर शासन, प्रशासन आणि जनता हे सगळेच बेपर्वाईने वागले, असे परखड निरीक्षण नोंदवतानाच हा कठीण परीक्षेचा काळ आहे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी सकारात्मक राहावे, असा सल्ला यावेळी भागवत यांनी दिला. यश किंवा अपयश हे अंतिम नसते आणि वाटचाल चालू ठेवण्यासाठी ते साहस बाळगणे हे महत्त्वाचे असते असेही ते म्हणाले.
भागवत यांनी यावेळी ‘कुछ बात है की हस्ती मिटती नही हमारी’ या कवी इक्बाल यांच्या काव्यपंक्तीचा दाखला दिला. सध्या प्रत्येकाने सकारात्मक मनःस्थिती ठेवून कोरोना निगेटिव्ह राहण्यासाठी सावधगिरी बाळगली पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.