Orphaned Sakal
देश

एका महिन्यात देशातील ६०० हून अधिक बालके अनाथ

कोरोनाच्या लाटेत फक्त एका महिनाभराच्या काळात देशातील सुमारे किमान ६०० बालकांनी आपल्या मातापित्यांचे छत्र गमावले आणि ती सर्वार्थाने अनाथ झाली.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - कोरोनाच्या लाटेत (Corona Waves) फक्त एका महिनाभराच्या काळात देशातील सुमारे किमान ६०० बालकांनी (Children) आपल्या मातापित्यांचे छत्र गमावले आणि ती सर्वार्थाने अनाथ (Orphaned) झाली, ही माहिती केंद्र सरकारनेच (Central Government) दिली आहे. (In one month more than 600 children in the country are orphaned)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेक जणांनी आपल्या आप्तस्वकीयांना गमावले. यातच कोरोनाने अनाथपण लादलेल्या बालकांची संख्या शेकडोंच्या घरात असल्याचे सरकारनेच मान्य केले आहे.

केंद्रीय महिला व बालविकास मंत्री स्मृति इराणी यांनी आज एका ट्विटद्वारे सांगितले, की संक्रमणाच्या या दुसऱ्या लाटेत एक एप्रिलनंतर आपले माता व पिता असे दोघांनाही गमावणाऱ्या मुलांची संख्या ५७७ आहे. देशातील विविध राज्यांकडून आलेल्या माहितीच्या प्राथमिक आधारावर हा आकडा केंद्राने काढला आहे. मृतांच्या आकडेवारीची परिस्थिती पाहता प्रत्यक्षात ही संख्या यापेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाने पोरके झालेल्या या बालकांच्या रक्षणाची आणि शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे, असे इराणी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. अनाथ झालेल्या या मुलांच्या कल्याणासाठी पैशाची अजिबात कमतरता नसल्याचे त्यांनी म्हटले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: भारताच्या सर्वात मोठ्या विजयासह कर्णधार गिलने मोडला गावसकरांचा ४९ वर्षांपूर्वीचा विक्रम अन् घडवला नवा इतिहास

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT