red fort history independence day esakal
देश

Independence Day 2025 : स्वातंत्र्यदिन लाल किल्ल्यावरच का साजरा होतो? जाणून घ्या रंजक कारण

Historical Significance of the Red Fort in India’s Freedom Struggle: दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावर 15 ऑगस्ट रोजी पंतप्रधान ध्वजारोहण करताना – स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची परंपरा कायम.

धनश्री भावसार-बगाडे

Independence Day Celebration At Red Fort :

यंदा 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी भारत पुन्हा एकदा शूर स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाला सलाम केला जात आहे. सोसायट्या आणि शैक्षणिक संस्थांपासून ते कामाच्या ठिकाणांपर्यंत, देशभरात स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल.

पण तरीही, सर्वांचे डोळे दिल्लीतील लाल किल्ल्याकडे लागलेले असतात, जे प्रत्येक वर्षी स्वातंत्र्य दिनाच्या उत्सवासाठी ठरलेले असते. 'लाल किल्ला' हे भारतातील स्वातंत्र्यलढ्याचे प्रतीक आहे. अगणित लढाया आणि रक्तपाताचे ठिकाण असण्यापासून ते विजयाचे प्रतीक होण्यापर्यंत, या किल्ल्याने भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील काही सर्वात संस्मरणीय टप्पे पाहिले आहेत.

1947 पासून एकापाठोपाठ भारतीय पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रध्वज फडकावला आणि स्वातंत्र्यदिनी राष्ट्राला संबोधित केले.

लाल दगडी प्रचंड मोठ्या बांधकामामुळे या किल्ल्याला लाल किल्ला असे नाव मिळाले. तो मुघल सम्राट शाहजहानने बांधला होता. हे शाहजहानची राजधानी असलेल्या शाहजहानाबादसाठी किल्ला-महाल म्हणून तयार तयार करण्यात आला होता. हा किल्ला मुघल स्थापत्यकलेचा सर्वोत्कृष्ट नमुना मानला जातो, ज्याला शहाजानच्या राजवटीत विशेष मान होता.

लाल किल्ल्याची देखरेख

लाल किल्ल्याचे नियोजन आणि स्थापत्य शैली राजस्थान, दिल्ली, आग्रा आणि आणखी दूरवर इमारती आणि उद्यानांसाठी प्रेरणास्थान आहे.

2007 मध्ये UNESCO ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेला, लाल किल्ला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) द्वारे देखरेख केली जाते. भारतातील सर्व राष्ट्रीय-स्तरीय वारसा स्थळे आणि जागतिक वारसा यादीत समाविष्ट असलेल्या भारतीय सांस्कृतिक गुणधर्मांच्या संरक्षणाची काळजी या संस्थेद्वारा घेतली जाते.

भारताच्या राजकारणाचा केंद्रबिंदू

सन १८५७च्या उठावात लाल किल्ल्याची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली. इंग्रजांविरुद्ध बंडाची ठिणगी टाकण्यात लाल किल्ल्याचा मोठा वाटा आहे. मुघल बादशहा बहादूर शाह जफरच्या नेतृत्वात लाल किल्ला राजकारणाचे केंद्र बनले. पण हे बंड अयशस्वी होताच इंग्रजांनी शेवटचा मुघल सम्राट बहादूरशाह जफरला ताब्यात घेऊन त्याची रंगून येथे रवानगी केली आणि लाल किल्ला पूर्णपणे इंग्रजांनी आपल्या ताब्यात घेतला. जेव्हा ब्रिटिशांनी भारतातून आपले बस्तान गुंडाळले तेव्हा कोहिनूर हिऱ्यासह लाल किल्ल्यातील अनेक मौल्यवान वस्तूंचा खजिनाही सोबत नेला. विशेष म्हणजे किल्ल्याचं फर्निचरदेखील इंग्रज त्यांच्या बरोबर घेऊन गेले होते.

लाल किल्ल्यावरच तिरंगा का फडकवला जातो?

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लाल किल्ल्यावरील ब्रिटीश ध्वज उतरवून त्याठिकाणी तिरंगा फडकविण्यात आला. आणि पुन्हा एकदा सत्तेचे केंद्र म्हणून लाल किल्ल्याला महत्त्व प्राप्त झाले. राजकारणात प्रतीकांना खूप महत्त्व असते. यामुळेच देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा राष्ट्रध्वज फडकवला. आणि तेव्हापासून प्रत्येक स्वातंत्र्यदिनी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकावून देशाला संबोधित करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Thalapathy Video : ''मुख्यमंत्रीजी, जर तुम्हाला बदलाच घ्यायचा असेल तर, मला.." ; विजय थलपतींचं थेट आव्हान!

Latest Marathi News Live Update: शुल्क वाढ रद्द करा...; पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांकडून पोस्टरबाजी

Asaduddin Owaisi : जादूगाराच्या मोहजालातून बाहेर पडा; युवकांनी प्रश्न विचारल्यानंतर अवघड होईल

औरंगजेबानंतर आता ‘असुरगुरू शुक्राचार्य’! ‘महाकाली’च्या फर्स्ट लुकमध्ये ओळखता सुद्धा येईना, पोस्टर व्हायरल

Nashik Crime : 'येथे लघवी करू नको' म्हणताच चाकू भोसकला; सुधारगृहातून पळून आलेल्या संशयिताने केला दुसरा खून

SCROLL FOR NEXT