Independence Day 2023  esakal
देश

Independence Day : लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आलेले टाइम कॅप्सूल म्हणजे काय? वर्षानुवर्षे यावर चाललाय वाद

जाणून घ्या काय असते टाइम कॅप्सूल

साक्षी राऊत

Independence Day Special Time Capsules History : लाल किल्ल्यावर कायम एक टाइम कॅप्सूल पुरण्यात आल्याची चर्चा असते. हे कॅप्सूल यासाठी ठेवण्यात आलंय जेणेकरून शेकडो- हजारो वर्षांनंतरच्याही पिढ्यांना आपल्या भारताचा इतिहास माहिती असावा.

टाइम कॅप्सूल अजूनही अनेक ठिकाणी पुरण्यात आलेलं आहे. हे कल्पना फार जुनी असली तरी त्यावर वादविवाद अजूनही सुरु आहेत. इतिहासाचा सखोल अभ्यास असणारे तज्ज्ञ यावर म्हणतात की राजकीय समुह यावर त्यांच्या सोयीप्रमाणे खरीखोटी माहिती देऊ शकतात.

कधी तिसरे महायुद्ध झाले आणि संपूर्ण जग नष्ट झाले तर माहितीचा स्त्रोत काय असेल? अलीकडे एक्सपर्ट्स जमिनीचे खोदकाम करून हेसुद्धा माहिती करून घेतात की हजारो वर्षांआधी लोकांची जीवनशैली आणि त्यांचे खाणेपिणे कसे होते. मात्र टाइम कॅप्सूल याची मॉर्डन पद्धत आहे. शेकडो वर्षे जमिनीच्या आत राहूनही हे कप्सूल खराब होत नाही. आणि यात असलेली माहितीसुद्धा सुरक्षित राहील. जाणून घ्या काय असते टाइम कॅप्सूल.

कसे असते टाइम कॅप्सूल?

हा एकप्रकारचा बॉक्स आहे जो कुठल्याही आकाराचा असू शकतो. हे अॅल्युमिनियम, स्टील किंवा तांब्यापासून बनवले जाते जेणेकरून जमिनीत पुरल्यानंतरही जास्त काळ टिकून राहील. तसेच यात लिखित माहिती अॅसिड फ्री पेपरवर असते. ज्यामुळे ती हजारो वर्षांपर्यंत जशीच्या तशी राहते.

या कॅप्सूल टाइम सेट करूनही पुरल्या जाऊ शकतात

कॅप्सूलचा डबा तीन फूट किंवा त्यापेक्षाही लांब असू शकतो. जो जमिनीत फार खोलवर पुरला जातो. जमिनीत खोलवर पुरण्यामागचं महत्वाचं कारण म्हणजे हजारो वर्षानंतरही ही माहिती सुरक्षित असवी. बहुतेकदा हे कॅप्सूल परत जमिनीतून कधी काढले जाईल याचा वेळ निश्चित करून आणि शेड्युल करून जमिनीत पुरल्या जाते. (Independence day)

भारतात किती टाइम कॅप्सूल आहे?

भारतात याला कालपत्र असेही म्हणतात. सगळ्यात आधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या कारकिर्दीत ऑगस्ट १९७२ मध्ये टाइम कॅप्सूल लाल किल्ल्याजवळ पुरण्यात आले होते. जमिनीत ३० फूट खोलवर पुरण्यात आलेल्या या कॅप्सूलबाबत असे म्हटले जाते की, या सातंत्र्यानंतरच्या २५ वर्षांच्या काळाचा इतिहास या कॅप्सूलमध्ये आहे.

मात्र या विषयावर कायम वादविवाद होताना दिसतो. अनेक राजकीय समुहांचा असा आरोप आहे की या कालपत्रात एक पार्टी आणि एक कुटुंब यांच्या कौतुकाव्यतिरिक्त दुसरं काहीच नसणार. देशाच्या इतिहासाचा यात अजिबात उल्लेख नसावा. असेही काही राजकीय नेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT