Independence day  google
देश

Independence day : स्वातंत्र्यलढ्यातील या घोषणा ठरल्या होत्या प्रेरणादायी

स्वातंत्र्याच्या वेळी लोकांमध्ये चैतन्य जागृत करण्यासाठी लढवय्यांनी अनेक पद्धतींचा अवलंब केला.

नमिता धुरी

मुंबई : देशाला स्वतंत्र करण्यासाठी अनेकांनी बलिदान दिले. शहीदांचे स्मरण करून आपण १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन साजरा करतो. केवळ लाल किल्लाच नाही तर सरकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि अनेक कार्यालये स्वातंत्र्याचा सण साजरा करतात.

स्वातंत्र्याच्या वेळी लोकांमध्ये चैतन्य जागृत करण्यासाठी लढवय्यांनी अनेक पद्धतींचा अवलंब केला. काहींनी आपल्या घोषणांच्या सहाय्याने तर काहींनी आपल्या साहित्यातून लोकांमध्ये देशभक्तीची भावना जागवली आणि लोकांना स्वातंत्र्यासाठी प्रेरित केले. यासाठी स्वातंत्र्यसैनिकांनी काही घोषणा दिल्या होत्या. कोणत्या होत्या त्या घोषणा पाहू या....

१. करा किंवा मरा - ही देशातील सर्वात प्रसिद्ध घोषणा आहे जी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दिली होती.

२. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच - ही प्रसिद्ध घोषणा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिली होती.

३. तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो - नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी देशातील लोकांमध्ये चेतना निर्माण करण्यासाठी ही घोषणा दिली होती.

४. इन्कलाब जिंदाबाद - हा नारा युवा सेनानी शहीद भगतसिंग यांनी दिला होता.

५. आराम हराम है - ही प्रसिद्ध घोषणा जवाहरलाल नेहरूंनी दिली होती.

६. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजु-ए-कातिल में है - ही घोषणा राम प्रसाद बिस्मिल यांनी देशवासियांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी दिली होती.

७. जय जवान जय किसान - लाल बहादूर शास्त्री यांनी देशातील नागरिकांसाठी ही घोषणा दिली होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Water News: मुंबईत पाणीकपात अलर्ट! १० आणि ११ मार्चला पाण्याचा मोठा तुटवडा; २४ तास राहणार खंडित, जाणून घ्या भागांची यादी...

IND vs NZ Final: वर्ल्ड कप फायनलसाठी भारताच्या Playing XI बाबत महत्त्वाचे अपडेट्स; न्यूझीलंडने हा विचार केलाच नसेल...

Latest Marathi News Live Update : किशोर कुमार यांचे गाणे ऐकताच दादांच्या स्वीय सहायक यांना कोसळलं रडू

T20 WC, IND vs NZ Final मध्ये जर बरोबरी झाली किंवा सामनाच रद्द झाला, कोणाला मिळणार विजेतेपद? काय सांगतो नियम, जाणून घ्या

Success Story: जिद्दीच्या जोरावर आदित्य पोलिस उपनिरीक्षक; नीरा येथे मिरवणुकीदरम्यान ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण

SCROLL FOR NEXT