china jinping 
देश

भारताच्या निर्णयाने बिथरला चीन, दिली जागतिक व्यापार संघटनेची धमकी

सकाळ वृत्तसेवा

नई दिल्ली- भारताने 59 चीनी अॅप्स बॅन केले आहेत. यामुळे हडबडलेल्या चीनने आता भारताला जागतिक व्यापार संघटनेच्या नावाने धमकी देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चीनने आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्यांचा दाखला दिला आहे. भारताच्या निर्णयाने चीनी कंपन्यांना मोठा धक्का बसला आहे. कारण त्यांना भारतासारखी मोठी बाजारपेठ जगात कुठेच मिळणार नाही. अशा परिस्थितीत भारताने घेतलेल्या निर्णयामुळे चीनची काळजी वाढली आहे. यामुळेच चीनने भारताला जागतिक व्यापार संघटनेच्या नावाने धमकी देण्यास सुरुवात केली आहे. 

अॅप्सवर बंदी घातल्यानंतर चीन बिथरला आहे. चीनने म्हटलं की, भारताचं हे पाऊल  जागतिक व्यापार संघटना आणि ई कॉमर्सच्या नियमांविरुद्ध आहे. भारतातील चीनच्या दुतावास प्रवक्त्यांनी सांगितलं की, भारताने जे पाऊल उचललं आहे ते गंभीर आणि काळजी करण्यासारखं आहे. या प्रकरणावर आम्ही लक्ष ठेवून आहे. भारत सरकारच्या या निर्णयाचा चीनकडून प्रखर विरोध केला जाईल. 

भारतातील चीनच्या दुतावासाचे प्रवक्ते जी रोन्ग यांनी म्हटलं की, भारताने जाणीवपूर्वक आणि भेदभाव करत काही चायनिज अॅप्सला काहीच विचार न करता हटवलं आहे. ही गोष्ट पारदर्शक प्रक्रियेला तडा जाणारी आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर संशयाच्या आधारे हे करण्यात आलं असून जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांविरुद्ध आहे. 

जागतिक व्यापार संघटनेचा नियम काय आहे?
अनेक आंतरराष्ट्रीय करारांच्या आधारावर जागतिक व्यापार संघटनेचे नियम तयार केले जातात. ते दोन किंवा दोनपेक्षा जास्त देशांमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आधारे तयार करण्यात आले आहेत. यामध्ये वेळोवेळी गरजेनुसार सुधारणाही केल्या जातात. यामध्ये जागतिक व्यापार संघटनेचे काही मूलभूत नियम महत्वाचे ठरतात. यामध्ये भेदभाव विरहीत, मुक्त व्यापार, भविष्यातील शक्यता, आर्थिक विकासाला चालना देणे किंवा विकास यासारख्या बाबींचा समावेश असतो. एखादा देश कोणाला मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा देत असेल तर जागतिक व्यापारी संघटनेच्या सिद्धांतानुसार त्यांना इतर सदस्य राष्ट्रांकडूनही त्याच प्रमाणात शुल्क आकारले पाहिजे. मात्र एखादा देश राष्ट्रहिताच्या पार्श्वभूमीवर एखादा निर्णय घेतो तेव्हा असा वाद सोडवण्यासाठी जागतिक व्यापारी संघटनेकडे धाव घेतली जाते. 

चीनला मोठा फटका
चिनी कंपन्यांना भारताच्या निर्णयाने हजारो कोटींचा फटका बसला आहे. तज्ज्ञांच्या मते भारताच्या या निर्णयामुळे चिनी अॅप्स चालवणाऱ्या कंपन्यांना मोठं आर्थिक नुकसान झेलावं लागणार आहे. टिकटॉकवर बंदीमुळे कंपनीला 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त दणका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे इतर अॅप्सचा विचार केल्यास चीनला किती मोठा फटका बसू शकतो याचा अंदाज लावू शकता. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP च्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी ५ नावांची चर्चा; कोणाच्या हाती जाणार संघटनेची कमान? सुनेत्रा पवारांसमोर मोठं आव्हान

भाजपला मोठा धक्का, ३ माजी आमदारासह ६ नेत्यांचा काँग्रेस प्रवेश

RCB vs SRH Live : हैदराबादच्या खेळात 'सॉल्ट'! तीन अविश्वसनीय कॅच, इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले, अनिकेत वर्माने झोडले

Pali News : मुंबई गोवा महामार्गाच्या खड्ड्यात चक्क मगरींचा मुक्काम! कामगारांची समयसूचकता अन मगरींना मिळालं नवजीवन

RCB vs SRH Live : पहिल्याच सामन्यात वाद... हेनरिच क्लासन अम्पायरच्या निर्णयावर नाराज... काव्या मारनही भडकली, सॉल्टच्या कॅचवर शंका?

SCROLL FOR NEXT