china_20india 
देश

16 तास चाललेल्या चर्चेत भारताने चीनला सुनावलं; 'पूर्व लडाखमधील इतर भागातूनही माघार घ्या'

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- भारत आणि चीनमध्ये शनिवारी आणखी एक चर्चेची फेरी पार पडली. विशेष म्हणजे शनिवारी सकाळी सुरु झालेली ही बैठक रविवारी सकाळी 2 वाजता संपली. चीन आणि भारतामधील लष्करी अधिकाऱ्यांमध्ये तब्बल 16 तास चर्चा झाली. चर्चेदरम्यान भारताने पूर्व लडाखमधील हॉट स्प्रिंग, गोगरा आणि देपसांग क्षेत्रातील सैन्य माघार घेण्यावर जोर दिला. दोन्ही देशांनी पैंगोंग त्यो तलावाच्या उत्तर आणि दक्षिणी भागातील सैनिक, शस्त्र आणि अन्य लष्करी उपकरणे हटवले आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी कोर कमांडर स्तरावर 10 व्या चर्चेची फेरी पाडली. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

पैंगोंग त्सो तलाव क्षेत्रातील सैन्य माघारीची प्रक्रिया 10 फेब्रुवारीला सुरु झाली होती. त्यानंतर गुरुवारी ती पूर्ण झाली. दोन्ही देशांमध्ये शनिवारी झालेल्या 10 व्या चर्चेच्या फेरीचे नेतृत्व लेफ्टिंनेट जनरल पीजीके मेनन यांनी केले. चिनी पक्षाचे नेतृत्त्व मेजर जनरल लिऊ लिन यांनी केले. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

भारत आणि चीनचे सैन्य पैंगोग त्सो तलावाच्या दक्षिण आणि उत्तर किनाऱ्यापासून माघार घेतली. या भागात गेल्या अनेक महिन्यांपासून दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे ठाकले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, 24 तारखेला कमांडर स्तरावर झालेल्या चर्चेदरम्यान बनलेल्या सहमतीनुसार दोन्ही देशाच्या सैनिाकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितलं होतं की, दोन्ही देशांचे सैनिक माघार घेत आहे. भारताने चीनला एक इंचभरही जमीन गमावलेली नाही. सैन्य परत बोलावत असलो, तरी लष्कर सतर्क आहे. 

5 मे रोजी भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये झडप झाली होती. त्यानंतर 15 जून रोजी दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला. अनेक दशकानंतर पहिल्यांदाच अशी घटना घडली होती. संघर्षात दोन्ही देशांना नुकसान झाले होते. भारताचे 20 जवान शहीद झाले होते, तर चीनचे 40 सैनिक मारले गेले असल्याची माहिती भारत सरकारने दिली होती. दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या. दुसरीकडे सीमेवर चीनने मोठ्या प्रमाणात सैनिकांची तैनाती केली. भारताने प्रत्युत्तर म्हणून 50 हजार सैनिक सीमेवर तैनात केले. मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही सीमेवर आणण्यात आला. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur IT Park : अखेर कोल्हापूरला ‘आयटी पार्क’चा मार्ग मोकळा! जागा हस्तांतर निर्णयावर लवकरच शिक्कामोर्तब

Pune Cold Wave: पुणे परिसरात थंडीचा कडाका कायम; पाषाणात किमान तापमान ८.३ अंशांवर

India USA Trade : भारतावरील आयातशुल्काच्या विरोधात ठराव; अमेरिकेत खासदारांचा पुढाकार; ट्रम्प यांच्या कृतीला विरोध!

Delhi Air Pollution : राजधानी दिल्लीचा श्वास गुदमरला ! AQI ४९१ वर, हवा बनली विषारी; श्वसन विकारांच्या रुग्णांत प्रचंड वाढ

Video : छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्य कसं होतं? तो काळ डोळ्यापुढं आणणारा AI व्हिडिओ व्हायरल; सच्चे मराठे असाल तर नक्की पाहाल

SCROLL FOR NEXT