harsh vardhan 
देश

देशात कोरोनामुक्त होण्याचं प्रमाण घसरतंय; आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीने चिंता वाढली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत वेगानं वाढ होत असून यामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडत आहे. रिकव्हरी रेटही घसरला असल्याचं दिसत आहे. देशातील कोरोनाच्या स्थितीबद्दल झालेल्या बैठकीनंतर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्ष वर्धन यांनी माहिती दिली. देशातील रिकव्हरी रेट कमी झाला आहे तर लसीकरण मोहिमेचा वेग वाढवला आहे असं डॉक्टर हर्षवर्धन यांनी सांगितलं. शुक्रवारी भारतात एका दिवसात कोरोनाचे 1 लाख 31 हजार 968 रुग्ण सापडले. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 30 लाख 60 हजार 542 इतकी झाली आहे. तर गुरुवारी दिवसभरात 780 जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत कोरोनामुळे 1 लाख 67 हजार 642 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं की, देशात सध्या 9 लाख 79 हजार 608 जणांवर उपचार सुरु असून 1 कोटी 19 लाख 13 हजार 292 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात गेल्या 24 तासात 13 लाख नागरिकांची कोरोना चाचणी झाली. 

कोरोनासंदर्भात उच्च स्तरीय 24 वी बैठक पार पडली. त्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, देशातील रिकव्हरी रेट कमी झाला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात रिकव्हरी रेट 96 ते 97 टक्क्यांवर पोहोचला होता. तो कमी होऊन जवळपास 91 टक्क्यांवर आला आहे. याआधीची बैठक झाली तेव्हा देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 लाख 53 हजार 847 इतकी होती. त्यावेळी दिवसाला 123 इतके मृत्यू होत होते तर आता हेच प्रमाण 780 मृत्यूंवर आलं आहे. सध्या 0.46 टक्के गंभीर रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत तर 2.31 टक्के आयसीयुमध्ये आणि 4.51 टक्के ऑक्सिजन सपोर्टेड बेडवर आहेत.

भारतात मृत्यूदर कमी आहे. सध्या मृत्यूदराचं प्रमाण हे 1.28 टक्के इतकं आहे. देशातील कोरोना आकडेवारीनुसार गेल्या 7 दिवसांमध्ये 149 जिल्ह्यांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही. तर 8 जिल्ह्यात 14 दिवसांपासून एकही रुग्ण नाही. 63 जिल्हे असे आहेत जिथं 28 दिवसांमध्ये एकही रुग्ण आढळलेला नाही.

भारतात लसीकरणाला सुरुवात झाली असून व्यापक अशी मोहिम राबदवली जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार भारतात 9 कोटी 43 लाख 34 हजार 262 लोकांना डोस देण्यात आले आहेत. गेल्या 24 तासात 36 लाख 91 हजार 511 जणांना लस देण्यात आली. गेल्या आठवड्यात दर दिवशी 43 लाख लोकांना लस दिली जात होती. भारताकडून जगातील 84 देशांना लसपुरवठा करण्यात येत असल्याची माहितीसुद्धा आरोग्यमंत्र्यांनी दिली. 

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितलं की, जवळपास 89 लाखांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 54 लाख कर्मचाऱ्यांना दुसरा डोस मिळाला आहे. याशिवाय इतर कर्मचाऱ्यांमध्ये 98 लाखांहून अधिक लोकांना पहिला डोस मिळाला असून 45 लाखांहून अधिक जणांना दुसरा डोसही मिळाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''मुंबईला चाललो म्हणून निघाले अन् रात्रीतूनच दिल्लीला गेले'', धनंजय मुंडेंच्या दिल्लीवारीची इनसाईड स्टोरी

Viral Video Mother Dolphin : मन हेलावणारी घटना! मृत डॉल्फिनच्या पिल्लाला वाचवण्यासाठी आईची धडपड, व्हिडिओ पाहून तुमचेही डोळे पाणावतील

Latest Marathi News Live Update : अजितदादा लवकरच मुख्यमंत्री होतील - आमदार अमोल मिटकरी

Lucky Rashifal 2026: कन्या राशीसह 'या'3 राशीच्या लोकांसाठी आनंददायी असेल नवे वर्ष, सर्व इच्छा पूर्ण होतील

IPL 2026 लिलावात अनसोल्ड राहिला, पण पठ्ठ्याने धीर नाही गमावला! देशासाठी नाबाद १७८ धावांची खेळी, २५ चौकारांचा पाऊस

SCROLL FOR NEXT