india covid 19 graph after unlock  
देश

अनलॉक 1 नंतर भारतात कोरोनाचा वेग भीतीदायक, लॉकडाऊनसोबत रुग्णही वाढले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली, ता. 09 : कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी देशात गेल्या अडीच महिन्यांपासून लॉकडाऊन करण्यात आलं होतं. लॉकडाऊनचे नियम एक जूनपासून शिथिल करत अनलॉक 1 केलं आहे. यामध्ये काही प्रमाणात व काही भागात सूट देण्यात आली आहे. मात्र या अनलॉक एकमध्ये पहिल्या पाच दिवसातच कोरोनाच्या रुग्णांमध्ये 50 हजारांची भर पडली. तज्ज्ञांच्या मते भारतात अद्याप कोरोनाचा कहर झालेला नाही. पण जूनच्या पहिल्या आठवड्यात समोर आलेली आकडेवारी भीतीदायक आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावाचे प्रमाण आता कित्येक पटींनी वाढलं आहे. जूनच्या सुरवातीपासून दररोज 9 ते 10 हजार रुग्ण सापडत आहेत.

गेल्या पाच दिवसांत भारतामध्ये 50 हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. लॉकडाऊनमधअये सूट दिल्यानंतर इतक्या वेगानं वाढणारी रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. भारतात कोरोनाचा पहिला रुग्ण 30 जानेवारीला सापडला होता. त्यानंतर कोरोनाने 100 रुग्णांचा आकडा गाठण्यासाठी 15 मार्च उजाडला होता. पण त्यानंतर कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्यानं वाढ झाली. पुढच्या 64 दिवसांतच भारतात एक लाख रुग्णांची संख्या पार झाली. पहिला रुग्ण ते एक लाख रुग्ण हा टप्पा भारताने 109 दिवसांत पार केला. 

पहिल्या शंभर दिवसांत भारतातील रुग्णसंख्या ही अमेरिका, स्पेन यासारख्या देशांच्या तुलनेत निम्मी होती. भारतात 20 मे पर्यंत रुग्णसंख्या नियंत्रणात होती. त्यानंतर पुढच्या दहा दिवसांनी लॉकडाऊन 4 संपला. त्यानंतर देशात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढला. दोन जूनला भारताने दोन लाख रुग्णसंख्या गाठली होती. दोन जूननंतर 8 जूनपर्यंत भारतात आणखी 50 हजार रुग्णांची भर पडली. यामुळे भारतात अडीच लाख कोरोनाचे रुग्ण झाले आहेत. 

केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 7471 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात देशात 271 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अडीच लाख रुग्णांपैकी 1.24 लाख रुग्ण ठणठणीत बरे झाले असून सध्या 1.25 लाख रुग्ण उपचार घेत आहेत. भारतात कोरोना रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण हे 48.35 टक्के इतके आहे तर मृत्यूदर 3.89 टक्के इतका आहे. सध्या कोरोना रुग्णांच्या संख्येत टॉपला असलेल्या पाच देशांपैकी रशिया आणि भारताचा मृत्यूदर सर्वात कमी आहे. भारतासाठी ही दिलासादायक बाब आहे.

भारतात कोरोनाने महाराष्ट्रात सर्वाधिक कहर केला आहे. देशातील रुग्णांच्या 36 टक्के इतके रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राने 90 हजार रुग्णांचा आकडा ओलांडला आहे. तर तामिळनाडुत जवळपास 32 हजार रुग्ण आढळले आहेत. याशिवाय दिल्लीत 28 हजार तर गुजरातमध्ये 20 हजारांपेक्षा जास्त रुग्ण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वीज गेली, मेणबत्तीच्या उजेडात रुग्णावर उपचार करण्याची वेळ; सरकारी रुग्णालयातला धक्कादायक प्रकार, VIDEO VIRAL

Duleep Trophy Final : तिलक वर्मा एकटा लढला, शतकाला एका धावेने हुकला; इशानच्या संघाकडे ३७२ धावांची आघाडी Video

रिल्सचा नाद, इंटरनेट सारखं बंद पडल्यानं व्हिडीओ अडकायचे; ५२ वर्षीय महिलेनं उचललं टोकाचं पाऊल

बापरे! कांदा-लसूण सुद्धा खात नाही अक्षय कुमार; दर सोमवारी असतो उपवास, नक्की कारण काय?

Marathi News Live Updates : पुण्यात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांने उचलले टोकाचं पाऊल

SCROLL FOR NEXT