laxmi vilas bank 
देश

लक्ष्मी विलास बँकेला सिंगापूर बँकेचा आधार; खातेदारांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - तमिळनाडूतील बुडीत निघालेल्या लक्ष्मी विलास बॅंकेचे विलीनीकरण सिंगापूरच्या डेव्हलपमेंट बॅंक इंडिया लिमिटेडमध्ये (डीबीआयएल) करण्यावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मोहोर उमटविली. याशिवाय राष्ट्रीय गुंतवणूक व पायाभूत सुविधा निधीमध्ये (एनआयआयएफ) आगामी दोन वर्षांत ६ हजार कोटींच्या निधीची भर घालण्याचा प्रस्तावही मंत्रिमंडळाने मंजूर केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार विषयक समितीच्या (सीसीईए) निर्णयांची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली. ९४ वर्षांची परंपरा असलेल्या लक्ष्मी विलासला बुडवणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल व बॅंकेच्या ४ हजार कर्मचाऱ्यांपैकी कोणाच्याही नोकरीवर संक्रांत येणार नाही, अशीही हमी केंद्राने दिली आहे.

जे कोणी कुशासन करून सहकारी बॅंकांना बुडवतील त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, असेही सरकारने रिझर्व्ह बॅंकेला सांगितले आहे, अशीही माहिती जावडेकर यांनी दिली. आत्मनिर्भर भारताला प्रोत्साहन देण्यावर मोदी सरकारचा जोर असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली.

गेल्या पाच वर्षांत देशात २३ हजार बॅंक गैरव्यवहारातून खातेदारांची सुमारे १ लाख कोटी रुपयांहून जास्त रक्कम बुडाल्याची रिझर्व्ह बॅंकेने अलीकडेच माहिती दिली आहे. यंदाच्या येस बॅंकेपाठोपाठ लक्ष्मी विलास या दुसऱ्या सहकारी बॅंकेची नौका दिवाळखोरीत बुडाली होती. स्टेट बॅंक ऑफ इंडियाने मार्चच्या आसपास ७२५० कोटींची गंगाजळी घालून त्या बॅंकेची ४५ टक्के भागीदारी घेतली होती.

दूरसंचार पायाभूतमध्ये परकी गुंतवणूक
आजच्या बैठकीत एटीसी दूरसंचार पायाभूत सुविधांमध्ये २४८० कोटींची थेट परकी गुंतवणूक (एफडीआय) करण्यासही मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचे जावडेकर म्हणाले. टाटा समूहाच्या या कंपनीचे १२ टक्के समभाग एटीसी पॅसिफिक एशियाने अलीकडेच खरेदी केले आहेत.

लक्ष्मी विलास बॅंक बुडाल्यानंतर सिंगापूरच्या बॅंकेच्या भारतीय उपशाखेने ती खरेदी करण्याचा प्रस्ताव रिझर्व्ह बॅंकेने नुकताच मान्य केला होता. केंद्राने त्यावर मोहोर उमटविल्याने या बॅंकेच्या २० लाख ५० हजार खातेदारांना दिलासा मिळणार आहे. एनआयआयएफमध्ये पुढच्या दोन वर्षांच्या काळात ६००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून त्यामुळे पायाभूत क्षेत्राच्या विकासासाठी बॉण्ड बाजारपेठेच्या माध्यमातून १ लाख कोटींहून जास्त रकमेची गुंतवणूक होईल अशी सरकारला आशा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील शिवाजीनगर न्यायालयात हजर; नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याच्या आरोप

Maharashtra School: राज्यात देशभक्तीचा सूर घुमणार! सर्व शाळांमध्ये ‘वंदे मातरम’ गीत बंधनकारक, महायुती सरकारचा मोठा निर्णय

Aadhaar Card Update Fees : महत्त्वाची बातमी! १ नोव्हेंबरपासून आधारकार्ड अपडेटसाठी शुल्कात झाला बदल

भारताचा पराभव अन् शिवम दुबेचा २१५१ दिवसांच्या वर्ल्ड रेकॉर्डला लागला ब्रेक; असा पराक्रम करणारा जगातील एकमेव खेळाडू

Dev Diwali 2025: यंदा देव दिवाळी ४ की ५ नोव्हेंबरला? जाणून घ्या तारीख, वेळ अन् शुभ मुहूर्त एकाच क्लिकवर

SCROLL FOR NEXT