Piyush Goyal Sakal
देश

भारत पुढच्या 5 वर्षात सागरी उत्पादनाच्या निर्यातीत करणार दुप्पट वाढ

सागरी उत्पादने निर्यात विकास प्रधिकरणाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

दत्ता लवांडे

कोची (केरळ) : भारत पुढच्या पाच वर्षात सागरी उत्पादनाच्या निर्यातीत दुप्पट वाढ करणार आहे. यासंदर्भातील माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. सध्या जवळपास ५० हजार कोटी रुपयांची निर्यात भारताकडून होते. पुढच्या पाच वर्षाच ही निर्यात १ लाख कोटी रुपयांवर नेण्याचं लक्ष्य भारताचं असेल असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.

"शाश्वत मासेमारी, नवनवीन प्रजाती आणि गुणवत्ता तसेच कोस्टल शिपींग आणि मत्यपालनाला चालना दिली जाणार आहे तसेच मत्स्यपालनाच्या अर्थव्यवस्थेला मदत करून हे लक्ष्या गाठलं जाईल." असं पियुष गोयल माध्यमांना बोलताना म्हणाले. सागरी उत्पादने निर्यात विकास प्रधिकरणाच्या कार्यक्रमात बोलताना ते असं म्हणाले आहेत. भारत निर्यात क्षेत्रामध्ये नव्या संधीसाठी आणि बाजारासाठी गुंतवणूक करणार असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे. तसेच सागरी उत्पादनाच्या निर्यातीत वाढीमुळे मासेमारी करणाऱ्या लोकांसाठी फायदा होणार आहे असं ते म्हणाले.

तसेच कोची येथे असलेल्या सागरी उत्पादने निर्यात विकास प्रधिकरणाचे कार्यालय कोची येथून हलवण्यासंदर्भात विचारले असता त्यांनी कार्यालय हलवण्याचे सगळ्या शक्यता फेटाळून लावल्या आहेत. निर्यातीत वाढ होण्यासाठी भारताने संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रेलियाबरोबर मुक्त व्यापार करार केला आहे. त्याचबरोबर अमेरिका आणि कॅनडा यांच्यासोबत करार करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान त्यांनी सागरी अन्न निर्यात संघटनेशी चर्चा केली आहे. संघटनेने त्यांच्या वेगवेगळ्या अडचणी यावेळी केंद्रीय मंत्र्यांसमोर मांडल्या आहेत. त्याचबरोबर गोयल यांनी केरळ, तामिळनाडू, कर्नाटक येथील मासेमारी करणाऱ्या लोकांची भेट घेतली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT