Indo-Tibetan Border Police टिम ई सकाळ
देश

युद्धाच्या पार्श्वभूमीवर चीन सीमेवर गस्त वाढली; गृह विभागाकडून व्हिडीओ शेअर

भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे पथक (ITBP) हिमाचल प्रदेशात -20 अंश सेल्सिअस तापमानात सीमेवर गस्त घालतानाचा व्हिडीओ शेअर केलाय.

सकाळ डिजिटल टीम

सध्या युक्रेन आणि रशिया (Russia) यांच्यातील युद्धाने अनेकांच्या चिंता वाढल्या आहेत.हे युद्ध थांबावे, यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहे तर अशातच भारत - चीन (India - China) सीमेवर पोलिसांची तैनात वाढली आहे. भारत-तिबेट सीमेवर (Indo-Tibetan Border) भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे पथक (ITBP) हिमाचल प्रदेशात -20 अंश सेल्सिअस तापमानात सीमेवर गस्त घालतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. (Indo Tibetan Border Police patrolling the borders in snowfall at -20 degrees celsius )

या व्हिडीओमध्ये हिमाचल प्रदेशात बर्फवृष्टीमध्ये 14,000 फूट उंचीवर -20 अंश सेल्सिअस तापमानात भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे सैनिक गस्त घालत आहे.यावरून भारत-तिबेट सीमेवर कडक बंदोबस्त दिसून येतोय. एकीकडे युक्रेन रशिया युद्धाचे संकट जगाच्या पाठीवर आहे तर यात आता भर म्हणून चीन पासून सुरक्षित राहण्यासाठी पोलीस दल सतर्क झाल्याचं पाहायला मिळतंय.

भारत-तिबेट सीमा पोलीस दल भारताचे एक सुरक्षा दल आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धानंतर २४ ऑक्टोबर १९६२ रोजी या दलाची स्थापना झाली होती. लद्दाख मधील काराकोरम पासून अरुणाचल प्रदेशातील दिफु ला पर्यंतच्या ३४८८ किमी लांबीच्या भारत-चीन सीमेवर हे दल तैनात असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Police : पोलिस अधिकाऱ्याच्या गळ्यातील ताईत डिपार्टमेंट बदनाम करतोय, मोका प्रस्ताव रद्द करण्यासाठी ६५ लाखांची केली मागणी अन्...

Bachchu Kadu : 'शेतकरी एकत्र येत नाही, हाच सर्वांत मोठा शोक'; बच्चू कडूंचा सरकारवर घणाघात

Kolhapur Dairy Scheme : गोकुळ दूध संघ शेतकऱ्यांना भरभरून देतय, शेतमजूर, अल्पभूधारकांना आणली आता नवी योजना, काय आहे फायद्याची स्कीम

Nirav Modi: प्रत्यार्पण खटला पुन्हा सुरू करा; नीरव मोदीस मानसिक आणि शारीरिक छळाची भीती

Latest Marathi News Live Update: राज्याला दुष्काळ मुक्त करण्याच्या दिशेने काम सुरु - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT