Internet Shutdown 2021 
देश

इंटरनेट शटडाऊनमध्ये भारताचा तिसरा नंबर; 4300 कोटींचे झालं नुकसान

सकाळ डिजिटल टीम

Internet Shutdown 2021 : इंटरनेट शटडाऊन झाल्यामुळे 2021 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला 5.45 बिलियन डॉलर (सुमारे 40,300 कोटी) इतके मोठे नुकसान झाले. एका रिपोर्टमधून हा माहिती समोर आली आहे. त्यानुसार, 2021 मध्ये जगभरातील इंटरनेट शटडाउन 36 टक्क्यांनी वाढ झाली आणि ते 30,000 तासांपेक्षा जास्त काळासाठी झाले. यामध्ये भारत पहिल्या 3 देशांमध्ये आहे जेथे गेल्या वर्षी इंटरनेट बंद पडल्याने झालेले नुकसान हे सर्वाधिक होते. रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की 2021 मध्ये देशात 1,157 तास इंटरनेट बंद होते. यामध्ये 582.8 मिलियन डॉलर(अंदाजे रु. 4,300 कोटी) चे नुकसान झाले आहे.

व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क्स (VPN) वर फोकस्ड वेबसाइट Top10VPN च्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 2021 मध्ये जागतिक इंटरनेट शटडाऊनमुळे 486.2 मिलीयन नागरिक प्रभावित झाले. 21 देशांमध्ये किमान 50 मोठे इंटरनेट शटडाउन झाले. इंटरनेट बंद होण्याचे 75 टक्के कारण सरकारी व्यत्यय होते, म्हणजेच सरकारच्या आदेशानुसार इंटरनेट बंद करण्यात आले होते.

म्यानमार, नायजेरीयानंतर भारताचा नंबर

इंटरनेट शटडाऊनच्या बाबतीत म्यानमार पहिल्या क्रमांकाचा देश होता. तेथे तब्बल 12,238 तास इंटरनेट बंद होते आणि 22 मिलीयन वापरकर्ते प्रभावित झाले. म्यानमारमध्ये इंटरनेट बंद केल्याने तब्बल 2.8 अब्ज डॉलर (सुमारे 20,700 कोटी रुपये) इतके नुकसान सहन करावे लागले. या यादीत नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. तेथे इंटरनेट आउटेजमुळे 104.4 दशलक्ष लोक प्रभावित झाले. यात $1.5 अब्ज (सुमारे 11,100 कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले.

म्यानमार आणि नायजेरियानंतर भारताचा क्रमांक लागतो. म्हणजे जगात तिसरा. गेल्या वर्षी देशात 1,157 तास इंटरनेट बंद होते. यात 317.5 तासांचा संपूर्ण इंटरनेट ब्लॅकआउट होता, तर 840 तासांचा बँडविड्थ थ्रॉटलिंग झाले. म्हणजेच या काळात फक्त 2G सेवा देण्यात आली. भारतातील इंटरनेट बंद झाल्यामुळे 2021 मध्ये 59.1 मिलियन लोकांना फटका बसला .

Top10VPN च्या रिपोर्टमध्ये खुलासा करण्यात आला आहे की, काश्मीरमध्ये भारतात सर्वाधिक इंटरनेट स्पीड कमी करण्यात आली. जवळपास 18 महिने केवळ 2G इंटरनेट देण्यात आल्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये राज्यात इंटरनेट पूर्ववत करण्यात आले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 2G स्पीडमुळे काश्मीरमध्ये इंटरनेट जवळजवळ निरुपयोगी झाले होते. यामुळे कोरोनाच्या काळात शिक्षण आणि व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रिपोर्टनुसार, शेतकऱ्यांच्या मोठ्या आंदोलनामुळे सरकारने दिल्लीमध्ये स्थानिक इंटरनेट ब्लॅकआउट लागू केले होते, ज्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT