jairam ramesh on veer savarkar row say will stop saying truth about their leaders if
jairam ramesh on veer savarkar row say will stop saying truth about their leaders if  
देश

Veer Savarkar : '...तेव्हा तुमच्या नेत्यांबद्दल खरं बोलणं बंद करू'; जयराम रमेश यांचं भाजपला आवाहन

सकाळ डिजिटल टीम

कॉंग्रेसची भारज जोडो यात्रा मागील काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली होती. यानंतर ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्या दिवशी काँग्रेस भाजप, आरएसएसच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल, असे विधान जयराम रमेश यांनी केलं आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांच्या काही पत्रांचा संदर्भ देत आरोप केला होता की ते ब्रिटिश सरकारची माफी मागीतली आणि त्यांच्यासाठी काम करायचे. यानंतर वाद चांगलाच चिघळला होता.

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी रविवारी राहुल गांधींच्या सावरकर वक्तव्यावरून सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस काँग्रेस नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, त्याच दिवशी काँग्रेसही आपल्या नेत्यांबद्दल खरे बोलणे बंद करेल. महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना जयराम रमेश म्हणाले, हा मुद्दा आता संपला आहे. गेल्या तीन दिवसांपासून मी निवेदन देत आहे. ज्या दिवशी भाजप आणि आरएसएस आमच्या नेत्यांबद्दल खोटे बोलणे बंद करतील, आम्हीही त्यांच्या नेत्यांबद्दल खरे बोलणे थांबवू असे जयराम रमेश म्हणाले आहेत.

सावरकर वादावर भाष्य करताना भाजपचे राज्यसभा खासदार सुधांशु त्रिवेदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनीही मुघल राजा औरंगजेबाची पाच वेळा माफी मागितली होती असं म्हटलं होतं. यावर जयराम रमेश म्हणाले की, आता भाजपचा खरा चेहरा कळला आहे. सुधांशु त्रिवेदी यांच्याबद्दल तुम्हा सर्वांना माहिती आहे. ते माझे राज्यसभेतील सहकारी आहेत. आता हा प्रकार थांबला पाहिजे. दरम्यान सावरकरांवर भाष्य करताना राहुल गांधी म्हणाले होते की त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली आणि स्वतःला इंग्रजांचे सेवक म्हणवून घेतले, यानंतर हा वाद सुरू झाला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचे बचावकार्य तब्बल ६० तासांनंतर पूर्ण; मुंबई पालिका आयुक्तांनी दिली माहिती

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Timepass 3 Fame Actress: ‘टाईमपास 3’ फेम अभिनेत्रीला झालाय 'हा' आजार; पोस्ट शेअर करत म्हणाली, "मी गरोदर नाहीये हे..."

Alert: तुमच्या फोनमधील प्री-इंस्टॉल असलेले ॲप्स वेळीच करा डिलीट,अन्यथा ...

SCROLL FOR NEXT