Jawahar Nehru internationalized Kashmir issue by taking to un way says Nirmala Sitharaman  Sakal
देश

"नेहरू काश्मीरचा मुद्दा UN मध्ये का घेऊन गेले?"; निर्मला सीतारामन यांचा सवाल

सकाळ डिजिटल टीम

सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे देशातील राजकारण ढवळून निघाले आहे. यातच काश्मिर प्रश्नाबाबत बोलताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बुधवारी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर काश्मिरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन जात त्याचे आंतरराष्ट्रीयीकरण केल्याचा आरोप केला. हा मुद्दा जागतिक मंचावर जाऊ नये कारण हा भारतीय मुद्दा आहे, असे देखील त्यांनी पुढे सांगितले.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील पहिले युद्ध सुरू झाल्यानंतर जानेवारी 1948 मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिकेद्वारे पंतप्रधान नेहरू यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडे दाद मागितली होती. या याचिकेच्या आधारे सुरक्षा परिषदेने भारत आणि पाकिस्तानसाठी संयुक्त राष्ट्र आयोगाची स्थापना दोन्ही देशांमधील मध्यस्थी करण्यासाठी केली होती.

राज्यसभेत बोलताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, “हा मूलत: भारताशी संबंधित मुद्दा आहे. काँग्रेसने हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. कोणी नेला? आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेला. का? कारण ब्रिटीशांनी त्यांना काही सूचना केल्या असतील की अन्यथा हा मुद्दा सोडवला जाणार नाही आणि पंतप्रधान नेहरूंनी ते संयुक्त राष्ट्रात नेले"

पाकिस्तानचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी पुढे सांगितले की, पंतप्रधान नेहरू काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात घेऊन गेले त्याचा, आजपर्यंत आपले शेजारी त्याचा गैरवापर करत आहेत. असेही त्या म्हणाल्या.

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे हे सांगत निर्मला सीतारामन पुढे म्हणाल्या की, “हा एक मुद्दा आहे जो जागतिक मंचावर जाऊ नये. ही मूलत: भारतीय समस्या आहे, ती आपण हाताळू शकलो असतो. आम्ही आता ते हाताळत आहोत आणि फरक दिसत आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs CSK: सिक्स मारल्यानंतरही शिवम दुबेला कसं केलं आऊट? रवींद्र जडेजा म्हणाला, 'त्याला नेट्समध्ये गोलंदाजी केलीये, माहित होतं तो...'

RR vs CSK: वैभव सूर्यवंशीचा चेन्नईविरुद्ध झंझावात! विक्रमी अर्धशतक करत राजस्थानला मिळवून दिला 'रॉयल' विजय

लाडकी बहीण योजनेतून ७१ लाख महिला बाहेर, Ekyc साठी उरले फक्त २४ तास

IPL 2026: ७ वर्षे अन् २७७ सामने... CSK च्या बाबतीत पहिल्यांदाच घडली अशी घटना

खरात बोलतात तसं घडतं! माणिकराव कोकाटेंबद्दल तंतोतंत भविष्यवाणी केलेली; नामकर्ण आवारेंच्या पुस्तकात १३ पानं खरातवर

SCROLL FOR NEXT