देश

कर्नाटकचा सत्तासंघर्षः ...आता खलबते दिल्लीत

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - जारकीहोळी बंधूच्या बंडखोरीच्या हालचालीमुळे निर्माण झालेले काँग्रेस व युती सरकारातील संकट आता काहीसे शांत झाले आहे. मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी केलेली मध्यस्थी यशस्वी झाली असून जारकीहोळी बंधूंनी तूर्त माघार घेतली आहे.

दरम्यान, जारकीहोळी बंधूंच्या मागणीवर चर्चा करण्यासाठी सिद्धरामय्यांसह राज्याचे स्थानिक काँग्रेस नेते मंगळवारी (ता.१८) दिल्लीला रवाना झाले. सतीश जारकीहोळी यांनीही आपण दिल्लीला जाणार असल्याचे सांगितले.

येथील एका खासगी हॉटेलमध्ये मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी जारकीहोळी बंधूंशी चर्चा केली. यावेळी जारकीहोळी बंधूंनी कुमारस्वामी यांच्यासमोर आपल्या मागण्या मांडल्या. त्या त्यांनी मान्य केल्या.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सतीश जारकीहोळी म्हणाले, ‘आमच्या मागण्या पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी दिली आहे. टप्याटप्याने आमच्या सर्व समस्या दूर होतील. बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात कोणी हस्तक्षेप करू नये, अशी आमची मागणी होती. ती कुमारस्वामी यांनी मान्य केली आहे. कोणतीही समस्या असल्यास येऊन भेटण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. रमेश जारकीहोळी किंवा अन्य काही आमदार रिसॉर्टला जाणार नाहीत. बळ्ळारीला एक मंत्रिपद देण्याची मागणी पूर्ण करण्याची मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. रमेश जारकीहोळी यांनी उपमुख्यमंत्रिपदाची मागणी केल्याच्या वृत्ताचा त्यांनी इन्कार केला.

नायक समाजाच्या आणखी एका आमदाराला मंत्रिपद द्यावे, आपण सांगू त्या बेळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बदली करावी, नगर प्रशासन खात्याला अधिक अनुदान देण्यात यावे, अशा प्रमुख तीन मागण्या जारकीहोळी बंधूंनी मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत. 

असंतुष्ट आमदार रिसॉर्टमध्ये
एकीकडे काँग्रेसमधील संकट दूर करण्यासाठी ज्येष्ठ नेते दिल्लीला रवाना झाले आहेत, तर दुसरीकडे राज्यात रिसॉर्ट राजकाण सुरू झाले आहे. मंत्री रमेश जारकीहोळी कालपासूनच आपल्या अधिकृत निवासस्थानी न जाता खासगी रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. बाकीचे असंतुष्ट आमदारही रिसॉर्टमध्ये जाऊन मिळाले आहेत. असंतुष्ट आमदार एमटीबी नागराज, नागेंद्र, आनंद सिंग हे रमेश जारकीहोळी यांच्यासोबत आहेत. पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाचा निर्णय जाहीर करणार असल्याचे नागराज यांनी सांगितले. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

काँग्रेसमध्ये कोणत्याच प्रकारचे मतभेद किंवा असमाधान नाही. मंत्रिपद मागणे चूक नाही. काही जण मंत्रिपद, महामंडळाच्या अध्यक्षपदाची मागणी करीत आहेत. याचा अर्थ पक्षात मतभेद आहेत, असा होत नाही. जारकीहोळी बंधूंसह कोणीच पक्ष सोडून जाणार नाहीत. सत्तेच्या हव्यासापोटी भाजपकडून सरकार पाडविण्याचा प्रयत्न असून त्यांचे ऑपरेशन कमळ यशस्वी होणार नाही.
-सिद्धरामय्या
, काँग्रेस नेते

‘डी. के. साहेब चिल्लर राजकारण करीत नाहीत’ 
‘डी.के. साहेब चिल्लर राजकारण करीत नाहीत, ते आपल्या तोडीचेच राजकारण करतात’, अशी खोचक प्रतिक्रिया बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केली. पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार बेळगावच्या राजकारणात हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप सतीश व रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. त्यावर प्रथमच त्या प्रतिक्रिया देत होत्या. त्या म्हणाल्या, ‘मंत्रिपदासाठी मी कुणाला ब्लॅकमेल करणार नाही. बेळगावातील पक्षाच्या समस्यांबाबत काँग्रेस नेत्यांबरोबर स्वतंत्रपणे चर्चा करण्यात येईल. बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या समस्या अजून दूर झालेल्या नाहीत.’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT