KCRs daughter targets PM Narendra Modi
KCRs daughter targets PM Narendra Modi KCRs daughter targets PM Narendra Modi
देश

‘जीडीपी नरकात तर महागाई आकाशात; मोदी असतील तर अवघड आहे’

सकाळ डिजिटल टीम

जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. मोदी असेपर्यंत यात सुधारणा होणे अवघड आहे, असे म्हणत तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांची मुलगी व आमदार कविता यांनी पंतप्रधान मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधला आहे. के चंद्रशेखर राव यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपा प्रमुख अखिलेश यादव यांची भेट घेतल्यानंतर मुलीने हे विधान केले. (KCRs daughter targets PM Narendra Modi)

तेलंगणात २०२३ साली विधानसभा निवडणुका होणार आहे. परंतु, मे २०२२ मध्येच सर्व राजकीय पक्ष सक्रिय झाले. अलीकडेच राहुल गांधी आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी तेलंगणात सभा घेतल्या. दुसरीकडे केसीआर यांचा पक्ष तेलंगणा राष्ट्र समितीचे नेतेही सक्रिय झाले आहेत.

‘मोदी आहे तर कठीण आहे. जीडीपी नरकात आहे तर महागाई आकाशात आहे. पेट्रोल-डिझेल व गॅस सिलिंडरच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. उत्पन्न पाताळात आहे. कारण, मोदी (Narendra Modi) आहे तर कठीण आहे’ असे व्हिडिओ ट्विटरवर शेअर करीत कविता म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) कार्यकाळात देशातील जनता महागाईने (Inflation) त्रस्त आहे. गॅस सिलिंडरच्या किमतीने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही शंभर रुपयांच्या पुढे गेले आहेत. देशाचा जीडीपी सातत्याने घसरत आहे. महागाई गगनाला भिडत आहे. मोदी असतील तर अवघड आहे, असे कार्यक्रमात बोलताना आमदार कविता म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Opening: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजाराची जोरदार सुरुवात; निफ्टी नवीन विक्रमी उच्चांकावर

Covaxin: कोव्हिशिल्डच्या गोंधळानंतर कोव्हॅक्सिन बनवणाऱ्या भारत बायोटेकचा मोठा दावा, वाचा काय म्हणाली कंपनी

Crude Oil Prices: पेट्रोल-डिझेलचे दर होणार कमी! कच्च्या तेलाच्या किंमतीमध्ये मोठी घट

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

T20 World Cup: टीम इंडियात ४ फिरकी गोलंदाज का घेतले? कर्णधार रोहित शर्माने दिलं स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT