उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश
उच्च न्यायालयाचे सरकारला निर्देश 
देश

सरकारला जबाबदारी टाळता येत नाही : केरळ उच्च न्यायालय

सकाळ वृत्तसेवा

कोची : सरकारच्या लसीकरणविषयक धोरणामुळे एखाद्या व्यक्तीची रोजीरोटी गेली असल्यास ती सरकारची जबाबदारी नाही का? संबंधित व्यक्तीच्या तक्रारीचे निवारण करण्याची जबाबदारी ही सरकारवर येत नाही का? असा थेट सवाल केरळ उच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला केला आहे. आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त अशा लसीचा तिसरा डोस मिळावा म्हणून येथील एका व्यक्तीने न्यायालयामध्ये धाव घेतली होती.

संबंधित व्यक्ती ही कोरोना संसर्गाचा उद्रेक होण्याच्या आधीपासून सौदी अरेबियामध्ये वेल्डर म्हणून काम करत होती.तिने कोव्हॅक्सिनचे दोन डोस घेतले असलेतरीसुद्धा त्या लसीला आखाती देशांनी मान्यता दिलेली नाही. त्यामुळे तिच्या आंतरराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध आले होते. आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता असलेल्या लसीचा आपल्याला तिसरा डोस मिळावा, अशी मागणी करणारी याचिका संबंधित व्यक्तीने न्यायालयात दाखल केली होती.

या याचिकेकवर सुनावणी घेताना न्या. पी. व्ही. कुन्हीकृष्णन म्हणाले की, याबाबत केंद्र सरकारवर आरोप करण्याचा न्यायालयाचा इरादा नाही पण सरकारने दिलेल्या लसीमुळे एखाद्या व्यक्तीची रोजीरोटीच धोक्यात येत असेल तर तिच्या तक्रारीचे निवारण करण्याचे काम हे सरकारचे नाही का? आजच्या सुनावणीदरम्यान केंद्र सरकारची बाजू मांडणारे सहाय्यक सॉलिसिटर जनरल मनू एस यांना न्यायालयाने जागतिक आरोग्य संघटनेने कोव्हॅक्सिनला मान्यता दिल्यानंतर देखील सौदी अरेबियाने अद्याप या लसीला मान्यता का दिलेली नाही? याची माहिती घेण्याचे निर्देश दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

Appi Aamchi Collector: 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज केंद्रेची 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत एन्ट्री; साकारणार 'ही' भूमिका

Jayant Patil : मोदी सरकारबद्दल सामान्य माणूस, शेतकरी, युवक व महिलांच्यासह समाजाच्या सर्व घटकात प्रचंड चीड; जयंत पाटील

Team India squad T20 WC : सूर्यकुमार, बुमरावर भारताचे भवितव्य! टी-20 वर्ल्ड कपबाबत युवराज सिंगचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT