देश

लखीमपूर - ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणानंतर उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. आता लखीमपूर घटनेत मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

लखीमपूर इथं मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. तसंच मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. य़ाशिवाय जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते - अजय मिश्रा

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता यावर अजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते. ज्या लोकांचा मृत्यू झाला ते बहराईचचे होते. तसंच जेव्हा उप मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काही लोक जात होते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही लोकांनी गाडीतून उतरवून आमच्या लोकांना मारल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT