देश

लखीमपूर - ४ शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये आणि नोकरी

सकाळ डिजिटल टीम

शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

लखीमपूर इथं झालेल्या हिंसाचारात चार शेतकऱ्यांचा आणि चार भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यानंतर राज्यात वातावरण तापले असून कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर लखीमपूरमध्ये कलम १४४ लागू केले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या प्रकरणानंतर उच्च स्तरीय बैठक बोलावली आहे. आता लखीमपूर घटनेत मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या चार शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

लखीमपूर इथं मंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीखाली चिरडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपये देण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रशांत कुमार यांनी दिली. तसंच मृताच्या कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी देण्यात येईल. य़ाशिवाय जखमी शेतकऱ्यांना दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला असून या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.

घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते - अजय मिश्रा

केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांच्या मुलासह १५ जणांविरोधात तिकोनिया पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आता यावर अजय मिश्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, घटनास्थळी माझे दोन्ही मुलगे नव्हते. ज्या लोकांचा मृत्यू झाला ते बहराईचचे होते. तसंच जेव्हा उप मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी काही लोक जात होते तेव्हा शेतकऱ्यांमध्ये लपलेल्या काही लोकांनी गाडीतून उतरवून आमच्या लोकांना मारल्याचा आरोप मिश्रा यांनी केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT