Amit Shah  Sakal
देश

Loksabha election : अमित शाह मणिपूरमध्ये; ''घुसखोरी करुन सामाजिक व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न...'' नेमकं काय म्हणाले?

सर्व समुदायांना विश्‍वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना देऊन भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.’’

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : ‘‘मणिपूरमध्ये घुसखोरी करून येथील सामाजिक व्यवस्थेत बदल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही. ही लढाई तुकडे करणारे विरुद्ध एकत्र ठेवणारे यांच्यातील आहे,’’ असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज मणिपूर येथे केला.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारावरून विरोधी पक्ष भाजपवर टीका करत असल्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांची सोमवारी येथे सभा झाली. मणिपूरमध्ये शांतता कायम ठेवण्याचा निश्‍चय व्यक्त करताना शहा म्हणाले,‘‘मणिपूरमध्ये घुसखोरीचे अनेक प्रयत्न होत आहेत. याद्वारे येथील सामाजिक रचना बदलण्याचा डाव आहे. मात्र अशा लोकांनी कितीही प्रयत्न केले तरी आम्ही मणिपूरचे तुकडे होऊ देणार नाही.

सर्व समुदायांना विश्‍वासात घेऊन आणि राज्याचे तुकडे होऊ न देता मणिपूरमध्ये शांतता कायम राखणे, यालाच मोदी सरकारचे प्राधान्य आहे. आमचे मुख्यमंत्री बीरेन सिंह हे मोदींकडे कायम मागणी करत असतात. आंतरसीमा परवाना असल्याशिवाय मणिपूर एकसंध राहू शकत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हा परवाना देऊन भाजपने मणिपूरला ताकद दिली आहे.’’

मणिपूरमध्ये मागील वर्षी झालेल्या वांशिक संघर्षावरही अमित शहा यांनी भाष्य केले. ते म्हणाले,‘‘ईशान्य भारताचे नशीब बदलेल तेव्हाच भारताचे नशीब बदलेल. मी संघर्षाबद्दल संसदेतही बोललो आहे. हा संघर्ष मिटविण्यासाठी आम्ही हरप्रकारे प्रयत्न करत आहोत. या प्रयत्नांचाच परिणाम म्हणून परिस्थितीत सुधारणा होत आहे.’’

सर्व देश आणि संसदही तुमच्यासोबत आहे, याची ग्वाही मी मणिपूरला देतो. येथील प्रत्येक आव्हानावर आपण मिळून तोडगा काढू

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cyclone Montha: चक्रीवादळ 'मोंथा'मुळे देशभरातील हवामान बदलणार ; पुढील पाच दिवसांत 'या' राज्यांना पावसाचा इशारा!

मोठी बातमी! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; उमेदवारांना करता येईल २९ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ‘या’ वेबसाईटवर अर्ज; एका पदासाठी एकाच अर्जाची अट

Montha Cyclone update : 'मोंथा' चक्रीवादळाचं थैमान सुरू! आंध्र प्रदेशात किनारपट्टी भागाला जोरदार तडाखा

Fake Acid Attack Case : धक्कादायक! दिल्लीत विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ल्याचं प्रकरण बनावट असल्याचे निष्पन्न!

दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा, तरी..! निम्मा सोलापूर जिल्हा अतिवृष्टीच्या मदतीपासून दूर; 3.95 लाख शेतकऱ्यांना मिळाली नाही भरपाई, तालुकानिहाय संख्या...

SCROLL FOR NEXT