अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न रविवारी दुपारी जालना शहरातील अंबड चौफुली परिसरात झाला. यानंतर हिंगोलीतही त्यांच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी करण्यात आली.
भाईंदर पूर्वेकडून पश्चिमेकडे येणाऱ्या उड्डाणपुलावर झाला भीषण अपघात झाला असून भाईंदर डंपरखाली येऊन झेपटो डिलिव्हरी बॉयचा मृत्यू झाला आहे.
भारतीय नौदलाचे स्वदेशी बनावटीचे स्टेल्थ फ्रिगेट आयएनएस सातपुरा कोलंबो येथे पोहोचले, श्रीलंकेच्या नौदलाच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे उत्साही स्वागत केले, दोन्ही देशांची कायमची मैत्री आणि प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी संयुक्त वचनबद्धतेचे दर्शन घडवले असल्याचे भारतीय नौदलाने म्हटले आहे.
सासवड शहरात भाद्रपदी बैलपोळा ऊत्साही, मोठ्या उत्साही व आनंदी वातावरण हलगी, डफड्याच्या व बँड पथकाच्या तालावर साजरा करण्यात आला, पुरंदर तालुक्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर पिकांना पावसाची गरज होती. सध्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांची जोमदार पिके आहेत. शेतकरी वर्ग आनंदी असून ज्या बैलांच्या जीवावर शेती केली जाते ती शेती समाधानकारक असल्यामुळे अशा उत्साही वातावरणात बैलपोळयात विशेष उत्साह दिसत असून बैलांच्या पुढे डीजेच्या तालावर नाचत व फटाके फोडत मिरवणुकीला उत्साही स्वरूप असल्याचे पहावयास मिळाले.
सर्वपित्री अमावास्येनिमित्त अंतर योग फाउंडेशनतर्फे फोर्ट येथील गुरुकुलामध्ये ऐतिहासिक सामूहिक महालय श्राद्ध सोहळा पार पडला. सद्गुरु आचार्य उपेंद्र जी यांच्या मार्गदर्शनाखाली १२० महिला व १०० पुरुषांनी प्रथमच एकत्रितपणे श्राद्ध विधी केले. या सोहळ्यात ४२०० पिंडदान व ६० किलो तांदळाचे अर्पण करण्यात आले. शेकडो भक्तांच्या उपस्थितीत पारंपरिक बंधने मोडून काढणारा हा सोहळा अध्यात्मिक इतिहासात नवा अध्याय ठरला.
सप्तशृंगी गडावर ज्योत नेण्यासाठी जात असलेला महिंद्रा विरो वाहन नांदुरी - सप्तशृंगी गड घाटात गणपती टप्प्याजवळील वळणावर पलटी होवून झालेल्या अपघात भिलकोट, ता. मालेगाव येथील नवरात्रोत्सव मंडळाचा १ कार्यकर्ता ठार तर ११ पेक्षा अधिक भाविक जखमी झाले आहे.
सीमेवर देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांची ही दिवाळी गोड व्हावी म्हणून दरवर्षीप्रमाणे यंदाही भारत विकास परिषदे कडून दीपावली फराळ पाठवण्यात आला आहे. एकूण 13000 पॅकेट लष्करी छावणी मध्ये पोहोचणार आहे. या माध्यमातून देशभक्ती व राष्ट्रप्रेम अधिक वृद्धिंगत होत आहे.
मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात सतत घसरण होत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर लासलगाव कृषि उत्पन्न बाजार समितीने केंद्र सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली आहे.
नवरात्र उत्सवाला अवघे काही दिवस उरले असून फुलंब्री तालुक्यातील बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत आहे. दुर्गा मातेच्या मुर्त्यांचा बाजार मोठ्या उत्साहात भरला असून, गावोगावी देवीची स्थापना करण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढली आहे.
जीएसटी सुधारणांच्या अंमलबजावणीची घोषणा करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणावर, आप दिल्लीचे अध्यक्ष सौरभ भारद्वाज म्हणतात, "... असे वाटत होते की पंतप्रधान मोदी एच-१बी अर्जदारांना प्रायोजित करणाऱ्या कंपन्यांकडून आकारले जाणारे शुल्क १००,००० डॉलर्सपर्यंत वाढवण्याबद्दल आणि अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी शुल्क लादण्याबद्दल काहीतरी बोलतील, परंतु जीएसटीच्या बातम्या खूप जुन्या आहेत. पंतप्रधान मोदी रात्री ८ वाजता देशाला संबोधित करायचे, पण आज संध्याकाळी ५ वाजता, कदाचित आज रात्री ८ वाजता भारत विरुद्ध पाकिस्तान सामना असल्याने... भारताचे परराष्ट्र धोरण खूपच वाईट असल्याचे दिसते... आता लोकांच्या मनात उदासीनता आहे..."
आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करतांना म्हणाले की "मी सर्व राज्य सरकारांना 'आत्मनिर्भर भारत' आणि स्वदेशीच्या या मोहिमेत सामील होण्याचे आणि त्यांच्या राज्यात उत्पादन वाढवून गुंतवणुकीसाठी वातावरण निर्माण करण्याचे आवाहन करतो... जेव्हा राष्ट्र आणि राज्ये एकत्र काम करतील तेव्हा 'आत्मनिर्भर भारत'चे स्वप्न पूर्ण होईल."
पंतप्रधान मोदींचे देशाला उद्देशून भाषण सुरू झाले आहे.
एसटी महामंडळाची बस कल्याण पत्रीपुल ब्रिजवर बंद पडली असल्याने कल्याणवरून शिलफाटा दिशेने येणाऱ्या व जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. वाहतूक पोलिस आणि स्थानिक नागरिकांकडून बस बाजूला करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
२२ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी अरुणाचल प्रदेश आणि त्रिपूरा दौऱ्यावर जाणार आहेत. ईटानगर येथे दोन मोठ्या जलवुद्युत प्रकल्पांचे भूमिपुजन, तसेच विविध उपक्रमांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल, तर त्रिपुरामध्ये त्रिपुरा सुंदरी मंदिर संकुलातील विविध कामांचे लोकार्पण होणार आहे.
माजी क्रिकेटपटू मिथून मनहान यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात जाऊन आज अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या काटेजवळगा परिसरात तुफान पाऊस झालाय, वादळीवारा आणि मेघगर्जनेसह पाऊस झालाय, ओढ्याला आलेल्या पाण्यात 2 जण वाहून गेले, तर एकाचा मृत्यू झालाय ,
पुण्याच्या म्हाडा वसाहतीत गुंडांचा राडा.. हातामध्ये पिस्तूल घेऊन केला नाच..
इरफान शेख असे हातात पिस्टल घेऊन नाचणाऱ्या गुंडाचे नाव..
मी इथला भाई आहे सगळ्यांनी चड्डीत राहायचं कुणी गोंधळ करायचा नाही अशा आरोळी ठोकत इरफान शेख नाचला..
पिस्टल घेऊन नाचणाऱ्या इरफान शेख ला पोलिसांनी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह घेतल ताब्यात..
दहशत माजवल्या प्रकरणी आरोपी इरफान शेख याच्या विरोधात वारजे माळवाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
काँग्रेसजवळ बहुमत नसल्यामुळे किंवा आता लोकमत नसल्यामुळे त्यांना टोला लावल्याशिवाय आता दुसरा काहीही पर्याय उरलेला नाही. त्याच्यामुळे ते टोले लावून स्वतःचा टाईमपास करीत असतात.... असा टोला गृहराज्यमंत्री तथा भंडाऱ्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना लगावला. हर्षवर्धन सपकाळ यांनी फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधानपदाचे डोहाळे लागल्याची टीका केली होती. यावर पंकज भोयर यांनी प्रत्युत्तर दिले.
नवरात्रोत्सवही निर्विघ्न आणि शांततेत पार पडावा यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. याबाबत पोलिसांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार, मुले, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबत गरबा आयोजकांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत.
खानदेश आणि विदर्भाला जोडणाऱ्या मुक्ताईनगरच्या घोडसगाव पुलाची दुरवस्था झाली आहे. पुलावर पडले मोठे भगदड पडले असल्यामुळे वारंवार या मार्गावर अपघात होत असल्याच्या घटना घडत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असून वाहन चालकांसह प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
जालना येथे ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते हे आंदोलकांच्या भेटीला जात असताना त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी हा हल्ला केल्याचा आरोप होत आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे 'एक्स' अकाउंट हॅक झाल्याची माहिती समोर आली. रविवारी (ता. २१) रोजी एकनाथ शिंदे यांच्या ट्विटर अकाउंटवर हॅकर्सनी पाकिस्तान आणि तुर्कीच्या ध्वजांचे फोटो पोस्ट केले होते. त्यानंतर ताबडतोब सायबर क्राइम पोलिसांना सतर्क करून उपमुख्यमंत्री यांच्या एक्स हँडलचा प्रभारी असलेल्या टीमने नंतर अकाउंट परत मिळवले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
सांगोला तालुक्यात दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टी झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे.
कडलास येथे भटक्या विमुक्त जमातीच्या लोकवस्तीमध्ये पाणी शिरल्याने गोरगरीब लोकांचे संसार उघड्यावर आले आहेत.
अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व गरीब कुटुंबाना सांगोल्याचे शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या वतीने पंधरा दिवस पुरेल इतके अन्नधान्य,भाजीपाल्यासह जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
जालन्यात वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न...
वकील गुणरत्न सदावर्ते आज धनगर आंदोलक दिपक बोऱ्हाडे यांच्या भेटीसाठी जालना दौऱ्यावर आहेत.
पुण्याच्या ग्रामीण भागात बैलाबाबत कृतज्ञता व्यक्त करत शेतकरी बैलांना सकाळी अंगोळ घालुन गोडधोड नैवद्य देऊन वाजतगाजत मिरवणुक काढतो आता या बैलपोळा मिरवणुकीत भंडाराची उधळण करत डिजेच्या तालावर नृत्यांगना थिरकल्यात यावेळी गावक-यांनीही चांगलाच जल्लोष केल्याचे पहायला मिळाले.
गेल्या दोन महिन्यांपासून अनाधिकृत असलेले व वादग्रस्त ठरलेल्या कुलस्वामीनी कला केंद्र बंद करण्यात यावे यासाठी देवगाव (ता. पैठण) सह परिसरातील नागरिक विविध प्रकारे आंदोलने करून विरोध दर्शवित आहे मात्र अद्यापपर्यंत हे केंद्र बंद करण्यात आले नसल्याने देवगाव येथील सरपंच योगेश कोठूळे, उपसरपंच भास्कर गीते यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन हे केंद्र सोमवार (ता. २२ ) पर्यंत बंद न झाल्यास मंगळवारी (ता. २३ ) सकाळी १० वाजता देवगाव येथील पाझर तलावात सामुहिकरित्या जलसमाधी घेणार असल्याचे निवेदन शुक्रवारी (ता.१९) रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे दिल्याने कला केंद्र बंद संदर्भातील घडामोडींना अचानक वेग आला
उद्यापासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होते. त्यामुळे रविवारच्या दिवशी नवरात्र उत्सव साजरी करण्यासाठी सार्वजनिक मंडळांची लगबग सुरू आहे. भांडुपच्या उत्साही मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. यंदाही त्याच उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे. यासाठी यावेळी सप्तशृंगी मातेच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येत आहे. यासाठी मंडळाचे कार्यकर्ते हे या मंदिराच्या देखाव्याला अंतिम स्वरूप देत आहेत.
गोळीबार करणाऱ्या कुख्यात गुंड निलेश घायवळ यांच्या गुंडांची कोथरूड परिसरात पोलिसांनी काढली धिंड
पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये तरुणावर गोळीबार करणाऱ्या तरुणांची कोथरूड परिसरातच काढली धिंड
मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आनंद चादलेकर या पाचही जणांची पोलिसांनी काढली धिंड
काल रात्री ज्या ठिकाणी या पाच जणांनी सामान्य नागरिकावर गोळीबार करून दहशत निर्माण केली होती त्याच भागातून
पोलिसांनी दिंड काढले आहे
सोलापुरात अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
राज्यभरात गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला प्रतिउत्तर म्हणून पडळकर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक
‘’शरद पवारांनी ज्यावेळी हातवारे करून देवेंद्र फडणवीस यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्यावेळी संस्कृतपणा कुठे होता?‘’
‘’पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आईचा AI विडिओ बनवून टीका केली ते कुठल्या संस्कृतीला शोभाणारे होते‘’
भाजप आमदार गोपीचंद पडळकर समर्थक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सवाल
पवई मेनगेट येथील तिरंदाज शाळेबाहेरील एका गाडीमध्ये तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळला
घटना स्थळी पवई पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन राजावाडी रुग्णालयात केला दाखल
पवई पोलीस या घटने बाबत पुढील चौकशी करत आहे
राज्यात सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे अध्यापन करणाऱ्या शिक्षकांच्या बदलीमुळे विद्यार्थी अश्रूंनी निरोप देताना दिसत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यातील आसोंदा गावातही असाच हृदय पिळवटून टाकणारा प्रसंग घडला.
प्राथमिक शाळेत गेल्या सात वर्षांपासून विद्यार्थ्यांना केवळ शिक्षणच नव्हे, तर मायेचा ओलावा देणाऱ्या शिक्षिका कल्पना वानरे यांची बदली हिंगोली तालुक्यातील पेडगाव जिल्हा परिषद शाळेत झाली आहे.
याची बातमी समजताच गावभर शोककळा पसरली. चिमुकले विद्यार्थी कोपऱ्यात बसून हुंदके देत होते, मातांनी कल्पना मॅडमच्या गळ्याला पडून रडायला सुरुवात केली आणि गावातील वयोवृद्धांच्या डोळ्यांतही पाणी दाटलं.
एखादा जिवलग कायमचा परदेशी निघून गेल्याचे दुःख जणू या विद्यार्थ्यांना आणि पालकांना झालं होतं.
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात बेनितुरा नदीला आलेल्या पूरपाण्यामुळे लातूर–कलबुर्गी महामार्गावर पाणी साचले आहे. यामुळे महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील कसगी गावाजवळील पूल पाण्याखाली गेला असून, कलबुर्गी आणि धाराशिव जिल्ह्यांमधील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार प्रविण स्वामी यांनी अधिकाऱ्यांसह घटनास्थळी पाहणी केली. पोलिसांनी पुल परिसरात बंदोबस्त ठेवला असून, तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार स्वामी यांनी केली आहे.
जालन्यात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. जालन्यातील भाटेपूरी शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने कपाशी, सोयाबीनसह फळबागा धोक्यात आल्या आहेत. भाटेपूरी येथील शेतकरी राम आटोळे या शेतकऱ्याचं सहा एकर कपाशी पीक पावसामुळे जमीनदोस्त झालंय.
साताऱ्यातील कोयना धरण भरलं आहे. त्यामुळे विसर्ग वाढवण्यात आलं आहे.
नाशिकच्या मालेगाव तालूक्यातील चाळीसगाव रोडवरील गिगाव फाटा परिसरात मालेगाव तालूका पोलिसांनी छापा टाकत अवैध गांजाची तस्करी करणा-या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्या कडून तीन लाख नऊ हजार रुपये किमतीचा १५ किलो ३६१ ग्रॅम गांजा जप्त केलाय.
तळोजात घरात घुसून एका अल्पवयीन मुलीची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या नात्यातल्याच एका व्यक्तीने केल्याची माहिती आहे. तळोजा फेस-2 मध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. 44 वर्षीय मोहम्मद आयुब साहिल याने आपल्याच नात्यातील एका 17 वर्षीय मुलीला भर दुपारी घरात घुसून तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिचा खून केल्याचं समोर आलं आहे. लग्नाला नकार दिल्याच्या रागातून हे कृत्यू केलं असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवात पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्यातील देवींची शक्तिस्थळे दर्शनासाठी पीएमपीएमएलकडून दोन विशेष पर्यटन बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार, रविवार आणि सार्वजनिक सुटीबरोबरच ग्रुप बुकिंगसाठी बससेवा उपलब्ध होणार आहे, या सेवेचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे..
संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यात, तसेच कोकण, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. तर उर्वरित राज्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीय. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिकसह काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय.
मेघगर्जनेसह पाऊस : रायगड, रत्नागिरी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर, धाराशिव.
हलक्या ते मध्यम सरी : मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, जळगाव, कोल्हापूर, सातारा, सांगली
पुण्यातील आयुष कोमकर खून प्रकरणातील तपासात आंदेकर टोळीच्या आर्थिक साम्राज्याचे नवे धागेदोरे समोर आले आहेत. पोलिसांनी बंडू आंदेकर व सहकाऱ्यांची तब्बल २७ बँक खाती गोठवली असून त्यांत ५० लाख ६६ हजार ९९९ रुपये असल्याचे उघड झाले आहे. यापूर्वी घरझडतीत कोट्यवधींचा ऐवज जप्त करण्यात आला होता. आरोपींच्या स्थावर मालमत्तेचीही चौकशी सुरू आहे. दरम्यान, वनराज आंदेकर खुनाच्या बदल्यासाठी टोळीने आंबेगाव पठार परिसरात रेकी केल्याचे उघड झाले असून संबंधित तपास भारती विद्यापीठ पोलिसांकडे आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.