maharashtra politics if i dont get anything i will go to field to cut sugarcane bjp cannot be mine why is pankaja munde Esakal
देश

Pankaja Munde : काहीच न मिळाल्यास ऊस तोडायला जाऊ - पंकजा मुंडे

भाजपच्या राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपच्या राजकारणात काहीशा बाजूला पडलेल्या माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्लीत एका कार्यक्रमात नाराजी व्यक्त केली. आपल्याला पदाची लालसा नसून काही न मिळाल्यास आपण ऊस तोडायला शेतात जाऊ, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी भावना व्यक्त केल्या.

राष्ट्रीय समाज पक्षाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्लीत कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर उपस्थित होते. यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी कुणाचे नाव घेऊन टीका केली नाही; परंतु मागील पाच वर्षांपासून त्यांना भाजपातील राजकारणात बाजूला केल्याची खंत मात्र त्या लपवू शकल्या नाहीत.

‘‘आपल्याला राजकारणात आता काही मिळण्याची लालसा राहिलेली नाही. समाजातील अखेरच्या व्यक्तीच्या विकासासाठी काम करीत राहण्याचा सल्ला गोपीनाथ मुंडे यांनी दिला होता. त्याप्रमाणे आपली पुढील राजकीय वाटचाल राहणार आहे. राजकारणात काहीच राहिले नाही तर ऊस तोडायला शेतात जायची आपली तयारी आहे,’’ असे त्या म्हणाल्या.

धनगर समाजाच्या विकासासाठी प्रयत्न करायला हवेत. अहिल्यादेवी होळकर यांनी समाजासाठी आपले जीवन वेचले, हेच ध्येय प्रत्येक नेत्याने ठेवण्याची आवश्यकता आहे.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवले पुलाजवळ भीषण अपघात; ब्रेक फेल झालेल्या कंटेनरची वाहनांना धडक, दोघांचा मृत्यू

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण १७ वर्षे रखडले; खर्चात तब्बल ५५०० कोटींची वाढ, कोकणवासीयांचा संताप उफाळला

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT