नवी दिल्ली : नूपुर शर्माला आतापर्यंत दिल्ली पोलिसांनी का अटक केली नाही? प्रेषित मोहम्मद यांच्यावरील टिप्पणीशी संबंधित वाद हा भाजपने रचलेल्या षडयंत्राचा परिणाम आहे. याअंतर्गत देशातील लोकांमध्ये फूट पाडायची होती. लोकांमध्ये फूट पाडण्याचे भाजपचे धोरण आहे. ‘तुम्ही आगीशी खेळू शकत नाही’ असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी सोमवारी (ता. ४) पुन्हा एकदा नूपुर शर्माला अटक करण्याची मागणी केली.
फुटीरतावादी राजकारणावर विश्वास ठेवत नाही. आम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन, जैन, बौद्ध अशा सर्वांसाठी आहोत, असेही ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले. नूपुर शर्माच्या अटकेची मागणी ममता बॅनर्जी यांनी अशा वेळी केली आहे, जेव्हा कोलकाता पोलिसांनी काही दिवसांपूर्वी तिच्यावर गुन्हा दाखल केला होता.
कोलकाता (kolkata) पोलिसांनी नूपुर शर्माला नोटीस बजावून चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. नूपुर शर्माविरुद्ध कोलकात्याच्या वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. शर्माला २० आणि २५ जून रोजी दोन्ही ठाण्याच्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले होते. प्रवास केल्यास जिवाला धोका आहे. अशा परिस्थितीत कोलकात्यात चौकशीसाठी येऊ शकत नाही, असे नूपुर शर्माने नोटिसांना उत्तर देताना सांगितले होते.
नूपुर शर्माने नुकताच सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केला होता. ज्यामध्ये देशाच्या विविध भागांत तिच्यावर दाखल झालेले खटले दिल्लीला हस्तांतरित करण्याची मागणी केली होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले. त्यांच्या एका वक्तव्यामुळे देश पेटला आणि उदयपूरमध्ये कन्हैयालालची हत्या झाली, असे शर्माला फटकारताना न्यायमूर्ती परडीवाला आणि न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.