Election Commission esakal
देश

मणिपूरमधील 12 मतदान केंद्रांवर 5 मार्चला पुन्हा मतदान : निवडणूक आयोग

सकाळ डिजिटल टीम

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होत आहे.

इम्फाल : निवडणूक आयोगानं (Election Commission) मणिपूरमधील पाच विधानसभा मतदारसंघातील (Manipur Assembly constituency) 12 मतदान केंद्रांवर पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिलेत. या जागांसाठी 28 फेब्रुवारी रोजी मतदान झालं होतं. मणिपूरचे मुख्य निवडणूक अधिकारी राजेश अग्रवाल (Election Officer Rajesh Agarwal) यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हंटलंय की, या केंद्रांवर 5 मार्च रोजी पुन्हा मतदान होईल. खुंद्रकपम, सैतू, थानलॉन, हेंगलप आणि चुराचंदपूर विधानसभा मतदारसंघातील केंद्रांवर पुन्हा मतदान होणार असून या केंद्रांवर फेरमतदानाची शिफारस करण्यात आली होती, असं निवेदनात नमूद केलंय.

या मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनचं (EVM Machine) नुकसान करण्यात आलं होतं, त्यामुळं आयोगानं हा निर्णय घेतलाय. सरौथेल, न्यू कीथेलमानबी, सोंगसांग, माईते, तिनसेओंग, माझुरोन कुकी, चिंगफेई, खोइरेंटक, मोलसांग, लेइनोम, तिकोट आणि मौकोट या मतदान केंद्रांत पुन्हा मतदान होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 38 विधानसभा जागांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान झालं होतं, तर दुसऱ्या टप्प्यात 22 जागांसाठी 5 मार्चला मतदान होणार आहे.

मणिपूरमध्ये विधानसभेच्या एकूण 60 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान होणार होतं. मणिपूरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 27 फेब्रुवारी रोजी घोषित करण्यात आलं आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान 3 मार्च 2022 रोजी घोषित करण्यात आलं. मणिपूरमध्ये 10 मार्चला मतमोजणी होणार आहे. सध्या मणिपूरमध्ये भाजपचं सरकार (BJP Government) असून विद्यमान सरकारचा कार्यकाळ 19 मार्च 2022 रोजी संपत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT