resign esakal
देश

Resignation: टॉप IT कंपन्यांमध्ये 'Exit' चे प्रमाण 15 ते 20 टक्के

TCS मध्ये डिसेंबर तिमाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण 15.3 टक्क्यांवर पोहोचले आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : भारतीय आयटी क्षेत्र सध्या एका नवीन समस्येने त्रस्त झाले आहे. TCS, Infosys आणि Wipro सारख्या आघाडीच्या आयटी कंपन्यांमधून (IT Sector Jobs) कर्मचारी मोठ्या संख्येने राजीनामा देऊन बाहेर पडत आहेत. यामुळे दिग्गज कपन्यांना मोठ्या प्रमाणावर फ्रेशर्सची (Freshers) नियुक्ती करावी लागत आहे. (Employee Exit from Top IT companies)

टीसीएस सारख्या कंपनीलाही कर्मचाऱ्यांची पाठ

तीन प्रमुख भारतीय आयटी (Top IT Companies) कंपन्यांनी बुधवारी डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये कंपन्यांनी वाढत्या अॅट्रिशन रेटबाबत माहिती दिली आहे. पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय आयटी कंपनी TCS मध्ये डिसेंबर तिमाहीत नोकरी सोडणाऱ्यांचे प्रमाण (Employee Resignation In IT Sector ) 15.3 टक्क्यांवर पोहोचले आहे. याच्या एक चतुर्थांश आधी, म्हणजे जुलै-सप्टेंबर 2021 मध्ये हा दर 11.9 टक्के होता. टीसीएसच्या मते, आयटी उद्योगातील हा दर सर्वात कमी आहे. परंतु त्यानंतरही तो चांगला म्हणता येणार नाही.

इन्फोसिसला रामराम करणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक

दोन नंबरची भारतीय आयटी कंपनी इन्फोसिसबाबत (Infosys) बोलायचे झाले तर, येथे डिसेंबर तिमाहीत लोकांच्या बेरोजगारीचा दर 25.5 टक्क्यांनी वाढला आहे. सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत तो 20.1 टक्के होता. एका वर्षात इन्फोसिसमधील नोकरी सोडण्याचे प्रमाण 11 टक्क्यांनी वाढले आहे. याची भरपाई करण्यासाठी कंपनी फ्रेशर्सची नियुक्ती करत असून, 55 हजार फ्रेशर्सची भरती करण्यात येणार असल्याचे कंपनीने निकालात म्हटले आहे.

विप्रोची स्थितीही खराबच

तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या विप्रोची (Wipro) स्थितीही चांगली नाहीये. या कंपनीतील नोकरी सोडण्याचा दर सप्टेंबर 2021 च्या तिमाहीत 20.5 टक्के होता, जो डिसेंबर 2021 च्या तिमाहीत 22.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी विप्रोने 30 हजार नवीन लोकांची भरती करण्याची योजना तयार केली आहे.

या कंपन्यांमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती

एका अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात, तीन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी 1.34 लाखांहून अधिक जणांची भरती केली आहे. हे एक वर्षापूर्वीच्या तुलनेत सुमारे 4 पट जास्त आहे. टीसीएसने डिसेंबर तिमाहीत 34 हजार लोकांना नोकरी दिली आहे. यापूर्वी एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत कंपनीने 43 हजार जणांची भरती केली होती. दरम्यान, कंपनीतर्फे जानेवारी-मार्च तिमाहीत नवीन लोकांची नियुक्ती करणार आहे. त्याचप्रमाणे ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत विप्रोमध्ये सुमारे 10 हजार आणि इन्फोसिसमध्ये सुमारे 15 हजार कर्मचाऱ्यांची वाढ झाली आहे. (Top IT Companies Recruitment's)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : पुण्यात पीएमपीच्या ब्रेकडाऊनमध्ये वाढ, एका महिन्यात २४०० घटना

SCROLL FOR NEXT