देश

बॉयफ्रेंडची पोलिसांकडे तक्रार करायला गेली अन् लग्न करूनच आली

सोशल मीडियावर रंगलीये या लग्नाच्या चर्चा

सकाळ डिजिटल टीम

प्रेम म्हटलं की त्यात रुसवे-फुगवे आलेच. अनेकदा हे वाद किरकोळ स्वरुपाचे असतात. तर, काही वेळा ते गंभीरही होतात. मात्र, अशाच एका किरकोळ कारणावरुन वाद झाल्यामुळे एका तरुणीने थेट पोलिस स्टेशन (police station) गाठत प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली. विशेष म्हणजे पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्याऐवजी या दोघांमधील मतभेद दूर करत त्यांचं पोलिस स्टेशनमध्येच लग्न (marriage) लावून टाकलं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या अनोख्या लग्नाची चर्चा रंगली आहे. (marriage of couple in police station video goes viral)

राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील रामगंजमंडी येथे हे अनोखं लग्न पार पडलं आहे. २२ वर्षीय एक तरुणी आणि तिचा प्रियकर मोतीलाल यांचं किरकोळ कारणावरुन वाद झाले. ज्यामुळे रागाच्या भरात या युवतीने थेट पोलिस तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी तक्रार दाखल करण्याऐवजी या तरुणीची व मोतीलालची समजूत काढली आणि त्या दोघांचाही रुसवा दूर करत पोलिस स्टेशनच्या आवारात असलेल्या मंदिरात त्यांचं लग्न लावून टाकलं.

दरम्यान, मोतीलाल व त्याच्या प्रेयसीमधील वाद मिटल्यानंतर दोघांच्याही कुटुंबियांनी बोलवण्यात आलं आणि घरच्यांच्या संमतीने हा लग्नसोहळा पार पडला. विशेष म्हणजे या लग्नात एका पत्रकाराने भटजींची भूमिका पार पाडली. तर, पोलिस स्टाफमधील काही जण पाहुणे झाले. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतोय! सिद्धरामय्यांची घोषणा, डीके शिवकुमार यांनी चरणस्पर्श करत घेतले आशीर्वाद

Manoj Jarange: ३० मेपासून तळपत्या उन्हात आमरण उपोषण, जीव गेला तर फडणवीस जबाबदार... मनोज जरांगे यांची कठोर भूमिका!

Washim Accident: आनंदाचा क्षण काळ ठरला! धोंड्याच्या जेवणावरून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला, अपघातात दोन चिमुकल्यांसह वडिलांचा मृत्यू..

Kalyan Crime : ६ महिन्यांपूर्वी लग्न केलेल्या २५ वर्षीय लेकीची हत्या, वडिलांवरच संशय; काय घडलं?

Asian Relay India Host: भारताला मिळाली सर्वात मोठी गूड न्यूज! आशियाई स्पर्धांचे यजमानपद बहाल; पण सामने 'या' दोन शहरांत का होणार?

SCROLL FOR NEXT