massive fire at gwalior home 6 people died in the fire at mp 
देश

जीवाच्या आकांताने किंचाळी फोडली पण...

वृत्तसंस्था

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) : देशात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्यामुळे सर्वजण घरातच होते. अचानक घराला आग लागली, जीवाच्या आकांताने सहा जणांनी किंचाळी फोडली. पण, यामध्ये सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. इंदरगंज येथे संपूर्ण कुटुंबाचा आगीमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंदरगंज येथे एक पेंट शॉपचे दुकान आहे. दुकानाच्या वरील भागात कुटुंब राहा होते. लॉकडाऊनमुळे सगळेजण घरात होते. घराला अचानक आग लागली. आगीची तिव्रता पाहून शेजारील नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आग आटोक्यात आणली. पण, तोपर्यंत घरामधील सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला होता. मृतांमध्ये तीन मुले आणि तीन महिलांचा समावेश आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी घरातून सहा मृतदेह बाहेर काढले. आगीचे कारण समजू शकेलेले नाही.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. पण, आग आटोक्यात आणल्यानंतर सहा जणांचे मृतदेह पाहून अनेकांनी टाहो फोडला. पोलिसांनी सहा मृतदेह ताब्यात घेतले असून, ते शवविच्छेदनासाठी स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पंढरपूर तालुक्यात खळबळ! 'दहा लाखांची खंडणी घेताना कामगार नेता रंगेहाथ जाळ्‍यात'; बदनामी थांबविण्यासाठी पैशाची मागणी

India US Trade: करार अंतिम करण्यासाठी प्रयत्न; भारत-अमेरिका व्यापार कराराबाबत सचिव राजेश अग्रवाल यांची माहिती

PMPML Bus : ‘पीएमपी’ उत्पन्नात दरवाढीनंतर वाढ; उत्पन्न अडीच कोटींच्या उंबरठ्यावर

बीडमध्ये चाललंय काय? जमिनीच्या वादातून माजी सरपंचाची दहशत; रक्तबंबाळ होईपर्यंत तरुणाला बेदम मारहाण, पोलिसांवर राजकीय दबाव?

Latest Marathi News Updates : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची राज्य परिवहनच्या मुद्द्यावर सखोल चर्चा झाली

SCROLL FOR NEXT