Vaccination
Vaccination Sakal
देश

लसीकरणाचा 1 मेचा मुहूर्त टळणार?

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - येत्या एक मेपासून केंद्र सरकारने १८ ते ४५ वर्षे वयोगटातील नागरिकांना कोरोना प्रतिबंधिक लसीकरण करण्याचे जाहीर केले होते. प्रत्यक्षात लशींच्या मर्यादित उपलब्धतेमुळे बहुतांश राज्यांमध्ये एक मेचा मुहूर्त टळण्याची चिन्हे असून या दिवशी लसीकरण मोहीम सुरू होण्याबाबतही अनिश्चितता असल्याचे चित्र आहे.

कोरोनाच्या संसर्गाला चाप लावण्यासाठी केंद्राने लसीकरणाची वयोमर्यादा शिथिल करताना एक मेपासून अठरा वर्षांवरील नागरिकांनाही लस देण्याचे जाहीर केले आहे. अर्थातच, या लसीकरणाची जबाबदारी केंद्राने राज्य सरकारांवर टाकली आहे. एकीकडे लशींच्या दरांवरून तसेच मोफत लसीकरणावरून आरोप प्रत्यारोपांचे युद्ध रंगले असून केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांनाही लशींचे दर कमी करण्याचे आवाहन केले आहे. दुसरीकडे या लसीकरणाला विलंब होणार असल्याचे संकेत विविध राज्यांकडून मिळत आहेत. ओडिशा, पंजाब, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड या राज्यांनी तर लस उत्पादक कंपन्यांकडून कधी लस मिळेल त्याआधारेच लसीकरण मोहीम सुरू करता येईल असे म्हटले आहे.

ओडिशा सरकार हतबल

ओडिशामध्ये राज्यात १ मे पासून लसीकरण मोहीम सुरू होणार असले तरी लशींच्या उपलब्धतेवर मोहीम अवलंबून असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. राज्य सरकारने मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे. मात्र यासाठी सीरम इन्स्टिट्यूट आणि भारत बायोटेक या कंपन्यांकडे लशींची मागणी करूनही लसपुरवठा कधी होईल हे निश्चित नाही. लस साठा आल्यानंतरच लसीकरणाला प्रारंभ होईल. तोपर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना यासाठी नावनोंदणी करता येईल, असे राज्याच्या लसीकरण मोहिमेचे प्रमुख विजय पाणीग्रही यांनी स्पष्ट केले आहे.

कॉंग्रेसशासित राज्ये हतबल

काँग्रेसशासित राज्यांनीही लस साठा १५ मे पूर्वी मिळणार नसल्याचे याआधीच म्हटले आहे. राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी अलीकडेच स्पष्ट केले होते की, ‘‘ सीरम इन्स्टिट्यूट केंद्र सरकारची मागणी पूर्ण करण्यात गुंतली असल्याने राजस्थानला १५ मे नंतरच लससाठा मिळू शकतो. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केंद्राकडून राज्याला १५ मे नंतरच लस साठा मिळणार असल्याने १८ ते ४४ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण १५ मे पूर्वी शक्य नसल्याचे म्हटले होते.’’

झारखंड, पंजाबमध्ये अनिश्‍चितता

छत्तीसगडचे आरोग्यमंत्री टी. एस. सिंगदेव यांनी राज्यात लसीकरणाची तयारी पूर्ण झाली असली तरी प्रत्यक्षात लस साठा आल्यानंतरच मोहीम सुरू होईल असे म्हटले आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चासमवेत सत्तेत भागीदार असलेल्या काँग्रेसचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी तर केंद्र सरकारने राज्याचा लससाठा पळविला असल्याचा आरोपही केला होता. पंजाबच्या अर्थमंत्र्यांनी तर लसीकरणासाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या निधीतून लसीकरण करण्याची मागणीही केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT