देश

सरकारनं रेशन कमी केलंय, आम्ही मरावं का? शेतकऱ्यांनी मेलेलंच बरं; कर्नाटकच्या मंत्र्यांची जीभ घसरली

काम बंद आणि रेशन कमी असल्याने आम्ही मरावे का? शेतकऱ्याचा प्रश्न

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : अन्न व नागरीपुरवठा मंत्री उमेश कत्ती यांनी वादग्रस्त विधान केले आहे. शिधापत्रिकेवर केवळ दोन किलो तांदूळ वितरित केले जात असून लॉकडाउन घोषित केल्यामुळे एका शेतकऱ्याने मंत्री कत्ती यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून 'लॉकडाऊनमुळे कामे बंद असून दोन किलो तांदूळ महिनाभर पुरतील का?' अशी विचारणा केली. काम बंद आणि रेशन कमी असल्याने आम्ही मरावे का? असा प्रश्न शेतकऱ्याने उपस्थित केला होता. त्यावर 'मेलेले बरे असे म्हणत मंत्री कत्ती यांनी त्यांच्याशी बोलणे टाळले होते. पण या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, मंत्री कत्ती यांनी शेतकऱ्याला दिलेल्या उद्धट उत्तराचे समर्थन केले आहे. धान्य नसले म्हणून कोणी मरतो का?, म्हणत त्यांनी यातून अंग काढण्याचा प्रयत्न केला आहे. या वादग्रस्त विषयावर सारवासारव करण्यासाठी बुधवारी (२७) त्यांनी पत्रकार परिषद घेतली. प्रारंभी आपण असे विधान केले नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना पत्रकारांनी ऑडीओ दाखविल्यानंतर त्यांनी त्याचे समर्थन करीत हा ऑडिओचा प्रकार शेतकऱ्याचा नसून स्वस्त धान्य दुकानातील रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांचा आहे. धान्य मिळत नाही म्हणून कोणी मरत नाही, असे म्हणत आपल्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले.

मंत्री कत्ती म्हणाले, शेतकऱ्यानेच आपल्याला मरू का? असे विचारल्यानंतर आपण त्यास तसे म्हणालो. आणखी आपण काय उत्तर देणार? तोच चुकीचे बोलत होता. स्वस्त धान्य दुकानातून पाच किलो तांदूळ ऐवजी दोन किलो तांदूळ व तीन किलो गहू किंवा जोंधळा दिला जात आहे. आता केंद्राकडूनही पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. काळ्या बाजारात तांदूळ विक्री करणे आधी थांबविले पाहिजेत, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडून खेद व्यक्त

बंगळूर : मंत्री उमेश कत्ती यांनी केलेल्या बेजबाबदार वक्तव्याचा राजकीय वर्तुळात निषेध व्यक्त करण्यात येत आहे. सोशल मीडियावर जोरदार टीका सुरू होताच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी दिलगिरी व्यक्त केली. एका मंत्र्याला असे बोलणे शोभत नाही. गव्हाची गरज नसलेल्या भागातील लोकांना ५ किलो तांदूळ देण्याची व्यवस्था केली जाईल, असे सांगून मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात, उमेश कत्ती यांच्या विधानाबद्दल खेद व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhiwandi Building Collapse : भिवंडीत भीषण दुर्घटना! चार मजली इमारत कोसळली, एकाचा मृत्यू; ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती

वर्षा ऋतू आणि वातदोषांचे संतुलन

मोठी बातमी! पदोन्नतीने मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्ताराधिकारी झालेल्यांनाही ‘टीईटी’चे बंधन; शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितली ‘ही’ मुदत, अन्यथा...

Commonwealth Games 2026 : घोर निराशा... तजिंदरपाल सिंग तूर पदक जिंकण्यापासून वंचित, समरदीप सिंगलाही अपयश; नेमकं कुठे चुकले?

Commonwealth Games 2026 : आजोबा भाजी विकायचे, वडील शिवणकाम करतात... लव्हप्रीतने भारतासाठी जिंकले ऐतिहासिक पदक!

SCROLL FOR NEXT