Indian Army esakal
देश

Indian Army : मोदी सरकार लष्करातील ब्रिटिश गुलामगिरी संपवणार; आता रेजिमेंटचं नाव, गणवेश बदलणार

देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी मोदी सरकार रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलत आहे.

सकाळ डिजिटल टीम

देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी मोदी सरकार रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलत आहे.

नवी दिल्ली : देशातील गुलामगिरीच्या खुणा नष्ट करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) रस्त्यांची आणि इमारतींची नावं बदलत आहे. अलीकडंच सरकारनं राजपथचं नाव बदलून 'कर्तव्य पथ' केलं. याशिवाय, मोदी सरकारनं नौदलाचा जुना ध्वजही रद्द केला. जुन्या नौदलाच्या ध्वजावर किंग जॉर्ज क्रॉसचं चिन्ह होतं. आता हा ध्वज नौदल म्हणून ओळखला जाणार आहे.

मोदींचा गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस

त्याच वेळी, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार आता भारतीय लष्करातील वसाहती प्रथा, युनिट्स आणि रेजिमेंटची नावं रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्देशानुसार, जनरल मनोज पांडे (General Manoj Pandey) यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैन्यानं (Indian Army) वसाहती प्रथा आणि दलातील युनिट्स आणि रेजिमेंटची नावं काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. 15 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावरून गुलामीच्या सर्व खुणा पुसून टाकण्याचा मानस व्यक्त केला होता. त्या अनुषंगानं लष्करातील ब्रिटिश वसाहतवादी नावं, प्रथा, परंपरा अन्य अनेक अशा गोष्टी ज्यांना गुलामीच्या खुणा म्हणू शकतो ते काढून टाकण्यात येणार आहे.

कुचकामी प्रथांपासून दूर जाणं आवश्यक

लष्कराच्या दस्तऐवजात म्हटलंय की, 'काही वारसा प्रथा ज्यांचं पुनरावलोकन आवश्यक आहे जसं की वसाहतवादी आणि पूर्व-वसाहत काळातील प्रथा आणि परंपरा, सैन्याचा गणवेश आणि वेशभूषा, नियम, कायदे, नियम, धोरणे, युनिट स्थापना, वसाहती भूतकाळातील संस्था, काही युनिट्सची इंग्रजी नावं, इमारती, आस्थापना, रस्ते, उद्यानं, ऑचिनलेक किंवा किचनर हाऊस सारख्या संस्थेचं नाव बदलणं.' लष्कराच्या मुख्यालयातील एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, 'ब्रिटिश वसाहतवादी वारसा दूर करताना पुरातन आणि कुचकामी प्रथांपासून दूर जाणं आवश्यक आहे. पंतप्रधानांनी लोकांना पाळण्यास सांगितलेल्या पाच प्रतिज्ञांच्या अनुषंगानं राष्ट्रीय भावनांशी जुळवून घेण्यासाठी भारतीय सैन्यानं या वारसा पद्धतींचं पुनरावलोकन करणं देखील आवश्यक आहे.'

'या' रेजिमेंटची नावं बदलण्यात येणार

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय लष्कराच्या खांद्याभोवती दोरी लावण्याचाही विचार केला जात आहे. याशिवाय, रेजिमेंटच्या नामांतराचाही विचार केला जात आहे. ज्या रेजिमेंटची नावं बदलल्याचा दावा केला जात आहे, त्यात शीख, गोरखा, जाट, पंजाब, डोगरा, राजपूत आणि आसाम या इन्फंट्री रेजिमेंटची नावं आहेत. या रेजिमेंट्सची नावं बदलण्यात येणार आहेत. कारण, त्यांची नावं ब्रिटिशांच्या रेकॉर्डनुसार ठेवण्यात आली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारतीय रणरागिणींनीही पाकिस्तानला दाखवला इंगा, वर्ल्ड कप सामन्यात चारली पराभवाची धूळ

World Cup 2025: भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर हस्तांदोलन केलं की नाही? सामन्यानंतर काय घडलं जाणून घ्या

Video: D Gukesh विरुद्ध विजय मिळवताच नाकामुरानं 'किंग' प्रेक्षकांमध्ये फेकला, अमेरिकन खेळाडूच्या सेलिब्रेशनवरून वाद

IND A vs AUS A: प्रभसिमरनचं वादळी शतक, तर श्रेयस अय्यर-रियान परागचीही फिफ्टी! भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकली ODI सिरीज

Coldrif Cough Syrup च्या दूषित बॅचवर बंदी! महाराष्ट्र एफडीएचा अलर्ट जारी, तक्रारीसाठी मोबाईल क्रमांक आणि ईमेल जाहीर

SCROLL FOR NEXT