modi-imran
modi-imran 
देश

मोदींकडून इम्रान यांचे अभिनंदन पण आमंत्रण नाही

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत-पाकिस्तानमधील संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना पत्र लिहून चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे. भारत-पाकिस्तानमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे, यासाठी ही पावले उचलली जात आहेत. 

भारत-पाकिस्तानमध्ये शांततापूर्ण चर्चा होणे व चांगले संबंध प्रस्थापित होणे गरजेचे आहे, असे मत पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान इम्रान खान यांनीही यापूर्वी भारताच्या राजदूतांसमोर मांडले होते. त्यानंतर इम्रान खान यांचा शपथविधी झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी अभिनंदनपर पत्र पाठवले होते. यात त्यांनी भारत-पाक संबंधाबाबत चर्चा करणे गरजेचे आहे, असे लिहिले आहे, असा दावा पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांनी केला.  

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री महमूद कुरेशी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, दोन्ही देशांमध्ये चर्चा होणे गरजेचे आहे. आपण शेजारी राष्ट्र असल्याने वाद न करता शांततेत चर्चेशिवाय पर्याय नाही. हे वाद असले तरी, संवादाच्या प्रक्रियेला सुरवात केली पाहिजे. यासाठीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना पत्र पाठवून चर्चेची तयारी दर्शवल्याचा दावाही त्यांनी केला.

पाकिस्तानच्या या दाव्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र पाठवले होते. यात चर्चेबाबतच्या प्रस्तावाचा उल्लेख नव्हता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Loksabha : पंतप्रधान मोदींची उद्या पुण्यात सभा ; सुमारे दोन लाख नागरिक उपस्‍थित राहणार,भाजपचा दावा

Apple Bug : अ‍ॅपलच्या यूजर्सना भेडसावतेय वेगळीच समस्या; रिसेट करावा लागतोय Apple ID पासवर्ड

लग्नाच्या दिवशी नवऱ्या मुलाने केली मोठी चूक; नवरीमुलीने थेट लग्न मोडलं

Viral Video: शिक्षिकेची गुंडागर्दी! शेजारच्या घरात घुसून गोंधळ, लहान मुलासह तीन जखमी.. व्हिडिओ व्हायरल

International Labour Day : राजीनाम्यानंतर नोटीस कालावधी पूर्ण करणे बंधनकारक आहे का? काय सांगतो नियम

SCROLL FOR NEXT