Modi’s brutal New India
Modi’s brutal New India 
देश

हा आहे मोदींचा 'क्रूर' इंडिया : राहुल गांधी

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली : राजस्थानमधील अलवार जिल्ह्यात गो-रक्षकांनी केलेल्या कथित हिंसेवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाना साधला. मोदींच्या क्रूर इंडियात मानवता संपली आहे. असे ट्विट करून टिका केली. यावेळी राहुल गांधी यांनी पोलिसांच्या भूमिकेवर आवाज उठवत द्वेषाने मानवतेची जागा घेतली आहे असे म्हटले आहे.

राहुल गांधी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "अलवार पोलिसांना जखमी अकबर खान यांना सहा किलोमिटर वरील रुग्णालयापर्यंत घेऊन जायला तीन तास का लागले. त्यांनी रस्त्यात चहाही पिला. हे मोदी यांचे क्रूर न्यू इंडिया आहे जिथे द्वेषाने मानवतेची जागा घेतली आहे. इथे लोकांना मारहाण करून मरण्यासाठी सोडून दिली जाते." 

शुक्रवारी (ता.20) रात्री अलवार जिल्ह्यातील लालवंडी जंगलात अकबर खान (वय 28 वर्ष, कोलेगाव हरियाणा) या तरुणाला गो-तस्करीच्या संशयावरून आपला जीव गमवावा लागला. रात्री 1 वाजता पोलिस घटनास्थळी पोहचले होते. घटनास्थळापासून सरकारी रुग्णालय केवळ चार किमीच्या अंतरावर आहे. तरिही पोलिसांनी जखमी अकबर खान याला पहाटे 4 वाजता रुग्णालयात दाखल केले. चार किमी अंतर जाण्यासाठी पोलिसांना तीन तास का लागले असा प्रश्न उपस्थित करुन पोलिसांकडेच संशयाने पाहिले जात आहे. खान याला रुग्णालयात दाखल करण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे रामगड सरकारी रुग्णालयाने स्पष्ट केले आहे.

अकबर खान यांना उपचारासाठी आणले असता त्यांचा एक पाय मोडला होता. त्याला रुग्णालयात आणण्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. असे डॉ. हसन अली खान यांनी स्पष्ट केले आहे. घटनेच्या तब्बल पाच तासांनी म्हणजे शनिवारी (ता. 21) सकाळी साडेऊवाजता एफआयआर दाखल करण्यात आली. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने पोलिसांनीही अकबर याला मारहाण केली. अन्याथ त्याचा जीव वाचला असता असा आरोप केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT