आयएमपीएस  esakal
देश

मुंबई : आयएमपीएस द्वारे आता पाच लाख रुपये पाठवता येणार

व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आज घेतला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : आयएमपीएस द्वारे पैसे पाठविण्याच्या पद्धतीची वाढती लोकप्रियता पाहून यातील व्यवहारांची मर्यादा दोन लाखांवरून पाच लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेने आज घेतला.

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या आयएमपीएस पद्धतीने चोवीस तास पैसे पाठविता येतात. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, एटीएम, एसएमएस, आयव्हीआरएस यापैकी कोणत्याही पद्धतीने हे पैसे पाठविता येतात. मात्र यातील व्यवहारांची मर्यादा फक्त दोन लाखांचीच असल्याने मोठी रक्कम पाठविणाऱ्यांना अडचणी येत होत्या. जानेवारी 2014 रोजी ही मर्यादा ठरविण्यात आली होती. एसएमएस व आयव्हीआरएस मार्फत फक्त पाच हजार रुपये पाठवता येतात.

आता आयएमपीएस ची ही मर्यादा पाच लाख रुपये करण्यात आली असून त्यासंदर्भातील आदेश लौकरच जारी केले जातील, असेही आज स्पष्ट करण्यात आले आहे. हल्ली आयएमपीएस पद्धतीने काही तासांमध्येच पैसे संबंधिताला मिळतात. ही पद्धती चोवीस तास वापरता येते. काही बँका ही पद्धती वापरणाऱ्या ग्राहकांकडून जादा पैसे आकारतात, मात्र अन्य बँका असे शुल्क आकारीत नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Goodluck Cafe Viral Video: पुण्यातील गुडलक कॅफेत बन मस्कामध्ये काचेचा तुकडा; खवय्यांमध्ये संताप, व्हिडिओ व्हायरल

टोमणे सहन न झाल्याने टेनिसपट्टू राधिकावर बापानेच झाडल्या गोळ्या; पोलिस तपासात धक्कादायक बाबी उघड, नेमकं काय घडलं?

PG Medical Courses: आरोग्य विद्यापीठाचे पीजी प्रवेश सुरू; तीन अभ्यासक्रमांच्या प्रवेश अर्जासाठी १३ जुलैपर्यंत मुदत

Space Technology Agriculture: स्पेस टेक्नोलॉजीमुळे शेतीत होईल क्रांती! इस्रो शिकवणार उपग्रहांचा शेतीमध्ये उपयोग, आजच करा अर्ज!

संगमनेर हादरलं! 'भूमिगत गटारात गुदमरून दोन कामगारांचा मृत्यू'; ठेकेदाराचा निष्काळजीपणा जबाबदार, नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT