देश

आधीच खिशाला कात्री, आता पडणार भगदाड ! नव्या दरांमुळे विमान प्रवास 30 टक्क्याने महागणार

प्रशांत कांबळे

मुंबई, ता.13: नागरी उड्डाण मंत्रालयाच्या विमान प्रवासाचे दर वाढवण्याच्या घोषणेमुळे सध्याच्या विमान प्रवासाचे तिकीट 30 टक्क्याने महागणार आहेत. या निर्णयामुळे विमान कंपन्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला असला तरी प्रवाशाच्या खिशाला कात्री लागणार आहे. 31 मार्चपासून  नवे दर लागू होणार आहेत.

विमान प्रवासाचे किमान आणि कमाल दर 10 ते 30 टक्काने वाढवले आहेत. कोरोना काळात केंद्र सरकारने मे महिन्यात डोमेस्टिक विमानसेवा सुरू केली होती, त्यावेळची परिस्थिती बघता विमान प्रवास दर स्थिर ठेवण्याची बंधने सरकारने विमान कंपन्यांवर लादली होती. त्यामुळे विमान प्रवास तिकिटांसाठीची डायनामीक पद्धती तात्पुरती स्थगित ठेवली गेली. परिणामी विमान प्रवासाचे दर स्थिर होते.

यामध्ये 40 मिनिटापेक्षा कमी प्रवासासाठी पहिले 2000 हजार रुपये कमाल दर आकारण्यात येत होता, गुरुवारपासून तो 2,200 रुपये करण्यात आला.  किमान दर 6000 वरून 7,800 एवढा करण्यात आला आहे.

mumbai news flight tickets prices to hike by 30 percent travelers are unhappy

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावरही लाचेचा मोह! नायब तहसीलदार ४० हजारांची लाच घेताना कार्यालयातच रंगेहाथ पकडला, नोटांना लावली होती पावडर अन्‌...

Onion Bhavan: शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक पाऊल! जगातील पहिले ‘राष्ट्रीय कांदा भवन’ महाराष्ट्रात होणार; पण कुठे? जाणून घ्या...

Railway Jewellery Theft : रेल्वे प्रवाशांना मदतीचा बहाणा; ४० लाखांचे हिरेजडित दागिने लंपास करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड!

Sai Jadhav : महाराष्ट्राच्या लेकीने घडवला इतिहास!, सई जाधव ठरली ९३ वर्षानंतर 'टेरिटोरियल आर्मी'ची पहिली महिला ‘लेफ्टनंट’

IND vs SA: शेवटच्या दोन T20I सामन्यांसाठी टीम इंडियात दोन वर्षांनी या अष्टपैलूचं पुनरागमन! अक्षर पटेलची घेणार जागा

SCROLL FOR NEXT