Narendra Modi Sakal
देश

Narendra Modi : "दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा..."; मोदी म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

कारगिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळीच कारगिलमध्ये दाखल झाले असून ते भारतीय जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. यावेळी त्यांनी जवानांना संबोधित केले असून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जवानांसोबत सीमेवर दिवाळी साजरी करणे हे माझं भाग्य आहे अशा भावना मोदींनी बोलताना व्यक्त केल्या आहेत.

(PM Narendra Modi with indian army soldier)

"कारगिलची दिवाळी कधीच विसरता येणार नाही. कारगीलने प्रत्येक वेळी भारताचा विजय केला आहे. हे भारताच्या विजयाचं प्रतीक आहे, दिवाळी हा दहशतवाद्यांच्या अंताचा उत्सव आहे त्यामुळे मी कारगिलच्या आठवणी कधीच विसरू शकत नाही" असं म्हणत नरेंद्र मोदींकडून कारगिलच्या विजयाच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.

"तुम्ही आहात म्हणून सगळे भारतीय सुरक्षित आहेत. पण जेव्हा देशाच्या सीमा सुरक्षित असतात तेव्हा देश सुरक्षित असतो आणि यामध्ये जवानांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. हे जवान हेच माझं कुटुंब आहे" असंही मोदी म्हणाले आहेत.

याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था दहाव्या स्थानावर होती, ती आता पाचव्या स्थानावर आली आहे असं मोदी म्हणाले असून ते आज जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलीला वाचवायला ५ जणांनी नदीत उड्या मारल्या, पाचही जण बुडाले, मुलगी वाचली

देऊळ बंद 2 ने रितेश देशमुखच्या सिनेमाला टाकलं मागं, 10 व्या दिवशी कोट्यवधीची कमाई, मध्यरात्रीचे शो सुद्धा हाऊसफुल्ल

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Latest Marathi News Live Update : प्रमुख मंदिरांच्या अधिकारांमध्ये मोठा बदल; धर्मदाय आयुक्तालयाकडे संपूर्ण सूत्रे

Ahilyanagar Crime: अहिल्यानगरात २१ दिवसांत ८६० गावठी दारू अड्ड्यांवर कारवाई; पांगरमलसारख्या दुर्घटनेच्या पुनरावृत्तीची भीती कायम

SCROLL FOR NEXT