Narendra Modi and Yogi Aadityanath Sakal
देश

मोदींकडून शैक्षणिक मुद्द्यांएवजी विरोधी पक्षांना गुद्दे

उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी कसे जंगलराज होते याचा पाढा मोदी यांनी वाचून दाखविला.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाचा जोर असलेल्या जाटबहुल पश्चिम उत्तर प्रदेशात, त्यात अलीगड सारख्या भागात भाजपच्या महत्वाकांक्षी राजा महेंद्रसिंह विद्यापीठाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मिशन यूपी‘चा शंखनाद केला. प्रतीकांच्या राजकारणाचे अग्रणी मानले जाणाऱ्या मोदींनी या राज्यात पुन्हा सत्ताप्राप्तीत आव्हान ठरू शकणाऱ्या समाजवादी पक्षावर व काही प्रमाणात बसपवर टीकेची झोड उठवून स्वपक्षीय नेत्यांना आगामी प्रचाराची दिशा दाखविली.

उत्तर प्रदेशात २०१७ पूर्वी कसे जंगलराज होते याचा पाढा मोदी यांनी वाचून दाखविला. सप-बसपचे गैरव्यवहार, गुंडगिरी याचा समाचार घेताना मोदी यांनी, एका विद्यापीठाच्या भूमीपूजनात नवीन शैक्षणिक धोरण व इतर अनेक शैक्षणिक बाबींचा उल्लेखही न करणे याचाच अर्थ ही त्यांची निवडणूक प्रचारसभा होती हे स्पष्ट आहे. भाजपच्या देशभरातील मुलूखमैदान तोफा आता सपाच्या राज्यातील कथित गुंडगिरीवर आग ओकणार हेही यातून स्पष्ट झाले.

कैराना, शामली यांसारख्या शहरांतून काही वर्षांपूर्वी हिंदूंच्या पलायनाच्या बातम्या येत असत. मोदींनी याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना म्हटले की पश्चिम उत्तर प्रदेशात ४-५ वर्षांपूर्वी लोक आपल्याच घरात घाबरून जगत असत. अनेक कुटुंबांना दहशतीमुळे आपली घरेदारे सोडून जावे लागले. माताभगिनींना घराबाहेर पडताना, शाळा-कॉलेजात जाता येता भयाचा सामना करावा लागे. आज योगींच्या सरकारमध्ये गुंडांना गुन्हे करताना शंभरदा विचार करावा लागतो.

पंतप्रधान पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशातील लोक हे विसरूच शकणार नाहीत की या राज्यात आधी किती मोठमोठे घोटाळे होत असत. राज्यकारभार तर पूर्ण भ्रष्टाचाराच्या आधीन होता. राज्याचे शासन-प्रशासन गुंडांच्या व माफियांच्या मनमानीवर चालत असे. आता हे गुंड गजाआड झाले आहेत. आज योगी सरकार पूर्ण प्रामाणिकपणे यूपीच्या विकासात समर्पित आहे. त्यांच्या राज्यात गरीबांचा सन्मान होतो. कोरोना काळात सर्वाधिक लसीकरण करणारे हे राज्य बनले आहे.

लोकसभेत तब्बल ८० खासदार पाठविणारा उत्तर प्रदेश प्रत्येक पक्षासाठी अनेक अर्थांनी महत्वाचा आहे. त्यातही भाजपसाठी २०२२ च्या सुरवातीला होणाऱ्या निवडणुकीत व २०२४ साठीही हे राज्य राखणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच मोदी-शहा यांना या राज्यातील चेहरा म्हणून योगी आदित्यनाथ यांचेच नाव नाईलाजाने का होईना स्वीकारावे लागल्याचे राजकीय तज्ज्ञांचे एकमत आहे. संघपरिवार व अल्प प्रमाणात सध्याचा भाजप यात निर्णय होईपर्यंत चर्चा होते. पण एकदा निर्णय झाला की तो सर्वांवर बंधनकारक होतो असे सरसंघचालकांनी दिल्लीत जाहीरपणे सांगितले होते. पंतप्रधानांनी आजच्या भाषणात योगी यांची जी अफाट स्तुती गायिली त्यातून हे सूत्र पुन्हा समोर आले.

स्थळ, काळ, वेळ अचूक

पंतप्रधानांनी प्रचाराचा प्रारंभ करण्यासाठी निवडलेले स्थान व वेळ अचूक असल्याचे मानले जाते. अलीगड मुस्लीम विद्यापीठाला समांतर असे विद्यापीठ उभारणे, त्यातून दिला जाणारा संदेश, राजा महेंद्र प्रताप सिंह अमर रहें अमर रहें...ही घोषणा जाट नेते सर छोटूराम व चौधरी चरण सिंह व अजित सिंह यांचा गौरव, शेतकरी आंदोलनाबद्दल एका शब्दानेही उच्चार न करता जाट समाजाचा, शेतकऱ्यांचा भाजपबद्दलचा जबरदस्त रोष कमी करण्याचा पहिला प्रयत्न या अनेक अंगांनी मोदी यांच्या भाषणाकडे जाणकार पहातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Power of Simple Living and Discipline : साधं राहणीमान अन् बचतीच्या जोरावर ४५व्या वर्षी निवृत्तीपर्यंत जमवले ४.७ कोटी; जाणून घ्या कसे?

Latest Marathi News Updates : दक्षिण मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची बैठक सुरु, अडचणींवर व नियोजनाबाबत होणार चर्चा

Video: प्रेमाची तालिबानी शिक्षा! काकाच्या मुलीवर प्रेम जडलं; रागात गावकऱ्यांनी प्रेमीयुगुलांना नांगराला जुंपलं, व्हिडिओ व्हायरल

८ चेंडूंत ६ विकेट्स.. पाच त्रिफळाचीत ! Kishor Kumar Sadhak ने इंग्लंडमध्ये सलग दोन षटकांत घेतल्या दोन Hat-Tricks

Parenting tips: पेराल ते उगवेल, आई वडिलांकडून अशा प्रकारे सवयी शिकतात मुलं

SCROLL FOR NEXT