देश

माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटते- नसरुद्दीन शहा

वृत्तसंस्था

मुंबई: समाजात मोठ्या प्रमाणावर विष पसरले आहे. यामुळे माझ्या मुलांना भारतात ठेवायला भीती वाटत असल्याचे विधान अभिनेते नसरुद्दीन शहा यांनी केले आहे. काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलिस अधिकाऱ्याची हत्या केली होती. त्या घटनेवर शहा यांनी भाष्य केलं आहे. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. 

3 डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला होता. यावरून बोलताना त्यांनी म्हटले आहे की, आता गाईचा जीव माणसाच्या जीवापेक्षा महत्त्वाचा झाला आहे, असंही ते म्हणाले. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावानं हल्ला केला. यामध्ये पोलिस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केलं. 'देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,' असं शहांनी म्हटलं. त्यांनी माध्यमांशी बोलताना अशी चिंता व्यक्त केली आहे.

गाईचे प्राण पोलिस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरलं आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावानं माझ्या मुलांना घेरलं आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल', अशा शब्दांत देशातील परिस्थितीबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, देशातील सध्याच्या परिस्थितीचा चीड येते, लोकांनादेखील याबद्दल संताप वाटला पाहिजे. हे आमचं घर आहे आणि यातून कोण आम्हाला बाहेर काढू शकतो, असा विचार लोकांच्या मनात यायला हवा,' असेही शहा यांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Transfer : अभिनेत्यांना नोटीस बजावताच तुकाराम मुंढेंच्या बदलीची चर्चा? २१ वर्षांत २५ बदल्या; FDAमधील धडक कारवाईने पुन्हा चर्चेत

पोलिसांच्या मारहाणीत ५५ वर्षीय पुजाऱ्याचा मृत्यू, कुटुंबियांचे गंभीर आरोप, न्यायालयाकडून चौकशीचे आदेश, नेमकं काय घडलं?

Paithan Farmers: शेतात जाण्यास रस्ताच नाही! दोन वर्षे पाठपुरावा करूनही न्याय नाही; शेतकरी भावंडांचे आमरण उपोषण

AAMIR KHAN FITNESS: 61 व्या वर्षी देखील आमिर खान फिट कसा? केबीसीच्या सेटवरच सांगून टाकलं गुपित, म्हणाला... 'मी रोज सकाळी उठून...'

Marathi News Live Updates : आंबोलीत ट्रकची कारला जोरदार धडक; दोघे जखमी, एकाची प्रकृती गंभीर

SCROLL FOR NEXT